नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ
सकाळी नऊ वाजता श्री मुक्ताबाई देवी मंदिरातून देवीची चांदीची मूर्ती पालखी मध्ये ठेवून मावळे आळी वाजवी आळी पेठ आळी मार्गे हनुमान चौकात आली तेथून बाजारपेठ मधून पूर्व वेस मार्गे पुन्हा मुक्ताई मंदिरात पालखी ग्राम प्रदक्षिणा घालत वाजत गाजत आणण्यात आली. याप्रसंगी देवीची महाआरती, अभिषेक करण्यात आला.
दुर्देवी- कालव्यात बुडणाऱ्या एकाचा मृत्यू , तिघांचे वाचवले प्राण
किरण वाजगे
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील आर्वी केंद्राजवळ वडज धरणाचा मीना शाखा कालवा व डिंभा धरणाचा डावा कालवा एकत्रित येणार्या संगमाजवळ शनिवार (दि.२३ ) एप्रिल रोजी दुपारी कालव्यात पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी तीन जणांना वाचवण्यात येथील चार युवकांना यश मिळाले. मात्र दुर्दैवाने १६ वर्षीय नौषाद गुलाम खान या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान माजी सैनिक चंद्रकांत मुळे यांच्या पत्नी वैशाली यांनी कालव्याजवळ असताना वाचवा वाचवा असा आवाज आल्याने त्यांनी जवळच असलेल्या युवकांना तात्काळ बोलावले. यावेळी तेथे असलेले युवक भूषण सोनवणे, सिद्धांत म्हस्के, निरंजन वैष्णव व सिद्धार्थ जाधव यांनी पाण्यात बुडत असलेले कुमार रेहान, कुमार शर्मा व नाव न समजलेला अन्य एक जण अशा तिघांना स्वतःचा जीव धोक्यात घालून कालव्याच्या बाहेर सुखरूप काढून जीवदान दिले.
या कामगिरीबद्दल नारायणगाव येथील श्री मुक्ताई देवी यात्रा कमिटीच्या वतीने या चारही युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दरम्यान पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या नौषाद खान चे वडील गुलाम मुस्तफा सलीम खान (रा. ओमकार समृद्धी सोसायटी, कोल्हेमळा, नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलिस स्थानकात आपल्या मुलाच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्याचा मृत्यू हा पाण्यात बुडून व दुर्दैवाने झाला असून त्याचे पोस्टमार्टम करू नये अशा आशयाचा जबाब नारायणगाव पोलीस स्थानकात दिला आहे.
दरम्यान गुलाम मुस्तफा खान यांचा कोल्हे मळा येथे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.माझा मुलगा माझी दुचाकी घेऊन आर्वी केंद्र येथे कालव्यावर पोहायला गेला व पाण्यात बुडाला अशी माहिती मिळताच मी काही जणांसह तेथे गेलो व माझ्या मुलाला नारायणगाव येथील मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे जबाबात गुलाम खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान तीन युवकांना जीवदान देणाऱ्या निरंजन वैष्णव, भूषण सोनवणे, सिद्धांत म्हस्के व सिद्धार्थ जाधव यांच्यावर तिघांचे प्राण वाचवल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निधन वार्ता- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते दत्तात्रेय जाधव यांचे निधन
केडगाव- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते कै दत्तात्रेय शंकर जाधव (वय ,76 वर्ष )यांचे दुःखत निधन झाले आहे त्यांच्या पश्चात दोन मुलं तीन मुली सुना नातवंडे आहेत केडगाव बोरीपार्धी चौफुला नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल दत्तात्रय जाधव यांचे वडील होते.
दशक्रीया विधी गुरुवार दि 27/4/2022 रोजी बोरमलनाथ मंदिर चौफुला या ठिकाणी सकाळी आठ वाजता होणार आहे
वंचितांच्या शिक्षणासाठी टच अ लाइफचे कार्य मोलाचे – शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे
नारायणगाव : किरण वाजगे
नव्या संगणक युगात प्रवेश करताना अजूनही दुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नाहीत या पार्श्वभूमीवर टच अ लाइफ आणि पारीख फाउंडेशन यांनी संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय अशी सर्व सुविधा युक्त सुसज्ज इमारत निर्माण केले आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे विचार पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे यांनी व्यक्त केले.
“मंदिराच्या कलशारोहण इतकाच महत्त्वाचा हा उपक्रम आहे, आपल्याकडे लोकशिक्षणाची चळवळ अजून प्रभावी पणे राबवण्यासाठी अशा दानशूर दात्यांच्या योगदानाची गरज आहे” असे मत तहसीलदार रविन्द्र सबनीस यांनी व्यक्त केले.पारीख फाऊंडेशन अशा सर्व उपक्रमांत सातत्याने योगदान देत राहील असा विश्वास मिलन पारीख यांनी व्यक्त केला.
येडेश्वर विद्यालय येडगाव येथे उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या उद्घाटन २३ एप्रिल रोजी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.या उपक्रमासाठी मोलाचे योगदान देणारे पारीख फाऊंडेशनचे जितूभाई पारीख आणि मिलन पारीख हे देखील उपस्थित होते.
टच अ लाइफ या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३५ शाळांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीची मोफत पाठ्यपुस्तके गेली चार वर्षे दिली जात आहेत आणि अकरा शाळांमध्ये सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि ई-लर्निंग प्रोजेक्टर देण्यात आलेला आहे अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक नरेश सुराणा यांनी दिली .
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ गुलाब नेहरकर, राजेंद्र रासकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सिताराम सोनवणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे आणि सचिव अशोक काकडे, मारुती ढोबळे, दीपक घाडगे,सुरेश कसार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गणपुले यांनी केले तर आभारप्रदर्शन दीपक घाडगे यांनी केले.
रामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांना पारितोषिक
कवठे येमाई (प्रतिनीधी धनंजय साळवे) – ग्रामीण भागातील महिलांना घर आणि मूल याच्या बाहेर पडता यावं या हेतूने महिलांची हैद्राबादला विमानाने सहल नेण्यात आली. रामोजी फिल्म सिटीच्या भटकंतीमध्ये ट्रिपच्या दरम्यान रामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांनी सहभाग घेतला आणि पारितोषिक पण मिळवले.
ग्रामीण भागातील महिलांना संधी मिळाली तर त्या जिद्दीने सर्व काही करू शकतात हा विश्वास महिलांमध्ये रुजताना दिसतोय.
आज ग्रामिण भागातील महिला आत्मविश्वसाने पुढे जाताना दिसत आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी प्राधानान्ये देत तर आहेच पण त्याचबरोबर स्वतःतील स्वत्व ओळखुन आपल्या आवडी निवडीलाही वाव देताना दिसत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सौ.वैशालीताई रत्नपारखी व त्यांचा गृप हे सतत ग्रामिण भागातील महिलांना स्वताच्या पायावर उभे रहाण्यासाठी व्यावसाईक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत असतात. त्याचबरोबर महीलांना पर्यटनाची संधी मिळावी म्हणुन राज्यात, परराज्यात , विमान,रेल्वे,आरामबस ने पर्यटनासाठी प्रवासाची संधी देत असतात.
ह्या सहलीमध्ये जिजाताई दुर्गै मा.सरपच निमोणे,साधना पोकळे ग्रा.पं.सदस्या कवठे, नंदा घोडे,साधना शेलार, सुषमा पठारे,कविता राक्षे,वसुंधरा पांचगे,संगिता शिन्दे,सारीका पोकळे,ज्योती पाटील,
माधुरी निगडे,प्रतिक्षा मेंगवडे ,राजश्री काळे,जया खांडरे,जया तरडे,रेखा महाजन,शुभांगी पवार ई.महिला भगिनींनी सहभाग घेतला.