भारतीय मजदूर संघाची ९ मे रोजी महागाईच्या विरोधात राज्यभर निदर्शने
कुरकुंभ ,सुरेश बागल
गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना जीवनावश्यक घटक अन्न धान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च, औषध उपचार चा खर्च भागविणे मिळणारे उत्पन्नात, पगार जिकिरीचे झाले आहे. आर्थीक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे, सामान्य माणूस या महागाईने मेटाकुटीला आलेला आहे तरी सरकारने या महागाई वर त्वरित अंकुश लावावा त्यासाठी पेट्रोलियम पदार्थ, अन्नधान्य, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला या वस्तूंच्या किमती त्वरित कमी करण्यात याव्या या मागणीसाठी भारतीय मजदूर संघ ९ मे २०२२ रोजी राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहे.
या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवहान भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे यांनी महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारिणी सभेच्या समारोपात केली आहे.दि २३ व २४ एप्रिल २०२२ रोजी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाची कार्य समितीची सभा येथे संपन्न झाली या सभेत महागाईच्या विरोधात ठराव करण्यात येऊन विविध जिल्हा मध्ये लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती अन्य राज्यापेक्षा प्रचंड जास्त आहेत या वाढत्या किमतीमुळे प्रवास खर्चात प्रचंड वाढत असून याचा परिणाम सर्व वस्तूंचे भाव वाढवण्यात झाला आहे. अन्य राज्यांनी पेट्रोलियम पदार्थाच्या किंमत कमी केलेले असताना महाराष्ट्रात् मात्र त्या कमी केल्या जात नाही. त्यातच गेली पाच महिने एसटीचा कामगारांच्या संप सुरू होता. या काळात सामान्य प्रवाशांची खाजगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवासींची प्रचंड लूट करण्यात आली. त्यातच कोरोनामुळे लोकांचे गेलेले रोजगार अजूनही पूर्ववत सुरू झालेले नाही. ऊद्योग क्षेत्रात बेरोजगारी चे प्रमाण ही मोठे आहे.
या सर्व परिस्थितीत सामान्य कामगार , मजूर वाढत्या महागाईने बेजार झाला आहे. सरकार मात्र त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वाढत्या महागाईमुळे राज्यातील नागरिकांचा रोष सरकारवर निर्माण झाला आहे. सरकारने राज्यातील कामगारांना नागरिकांना महागाई वर नियंत्रण आणण्यासाठी सकारात्मक योजना ची अंमलबजावणी केली पाहिजे. व दिलासा दिला पाहिजे अन्यथा कामगारांना रस्ता वर उतरून त्रिव आंदोलन करण्या वाचुन पर्याय राहणार नाही असे प्रतिपादन सरचिटणीस मोहन येणूरे यांनी केले.
या बैठकीस क्षत्रिय संघटन मंत्री मा श्री सी व्ही राजेश,अध्यक्ष अनिल ढुमणे, सरचिटणीस मोहन येणूरे, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संघटनमंत्री मा विलासराव झोडगेकर , उद्योग प्रभारी चंद्रकांत धुमाळ, केंद्रीय सेक्रेटरी निलिमा चिमोटे,संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे,सचिव विशाल मोहिते, प्रवीण अमृतकर, पुणे विभाग प्रमुख अर्जुन चव्हाण, पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ व विविध ऊद्योगातील पदाधिकारी, जिल्ह्या मधील पदाधिकारी यांनी चर्चा मध्ये सहभागी होवून विविध विषयांवर लक्षवेधी चर्चा मध्ये सहभागी होवून आंदोलनात सहभागी होण्यासाठी निर्धार व्यक्त केला.
संघटीत, असंघीटत कामगार, कंत्राटी कामगार, घरेलु कामगार, बांधकाम कामगार, सरकार ने संसदे मध्ये मंजूर केलेल्या कोड बिलातील त्रुटी, राज्य सरकारचे रूल्स मधील कामगार हिताचे बदल, १८ ऊद्योगातील कामगारांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या किमान वेतनात सुधारणा, ई ऐस आय दवाखाने व सुविधा , किमान पेन्शन रू ५००० प्रति माहे, बिडी कामगारांना रोजगार व किमान वेतन, कंत्राटी कामगारांना रोजगारात संरक्षण, कंत्राटदार विरहित रोजगार, शेत मजुर, उसतोडणी कामगार, ई ऊद्योगातील कामगारांचे प्रश्नां बाबतीत २१ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई येथे राज्य व्यापी भव्य मोर्चा काढण्या ची घोषणा भारतीय मजदूर संघ च्या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष श्री अनिल ढुमणे व सरचिटणीस श्री मोहन येणूरे यांनी केली आहे.
लोहगड सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदा साबळे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण साबळे यांची बिनविरोध निवड
पवनानगर – लोहगड विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती.तर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूकही बिनविरोध करण्यात आली. या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदासाठी नंदा संतोष साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता.त्याचबरोबर उपाध्यक्ष पदासाठी लक्ष्मण रामा साबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये एक एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात आली. सदर निवडणुकी ही निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निंबधक विठ्ठल सुर्यवंशी, विनोद कोतकर तर सचिव सदिप साबळे यांच्या समक्ष झाली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले,अनिल साबळे,बाळासाहेब जाधव,माजी चेअरमन गणेश धानिवले, रोहिदास साबळे,लहु साबळे, पोलीस पाटील भरत साबळे,सुरेश साबळे,चंद्रकांत साबळे,प्रशांत साबळे,माजी उपसरपंच प्रदिप साबळे यांच्या सह सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते.
पत्रकार सुनिल भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न प्रेरणा पुरस्कार 2022 प्रदान
उरुळी कांचन
संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. यांच्या तर्फे या वर्षी पासुन 2022 पुरस्काराचे अर्थात पहले वर्ष आहे. हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेड ध्येयाच ,समाजसेवेच असत, आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हा पुरस्कार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केला आहे.
सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक, ते समाजात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. अनेक आजच्या काळात अशी उल्लेखनीय माणस मिळणे कठीण आहे .सर्वत्र सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे कौतुक केले जात आहे. पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने थंड पाण्याची पाणपोई
अवसरी खुर्द- येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त स्वर्गीय अलका भगवान ढुमणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या भावीक भक्तांसाठी थंड पाण्याची पाणपोई सुरु करण्यात आल्याची माहिती मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. संतोष ढुमणे यांनी दिली.
डाॅ.संतोष ढुमणे यांच्या आई अलका भगवान ढुमणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली सहा वर्षे यात्रेकरूंसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चालू वर्षी उन्हाची तीव्रता अधिक तसेच मोठ्या संख्येने यात्रेकरू असल्याने थंड पाण्याच्या पाणपोईचा लाभ मोठ्या संख्येने यात्रेकरू घेत आहेत. पाणपोईचे उद्घाटन सुझलाॅन कंपनीचे वरीष्ठ अधिकारी विक्रम अभंग यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार सुदामराव बिडकर, पत्रकार प्रताप हिंगे,आय आर बीचे व्यवस्थापक रवींद्र वायळ,दिपक टेमकर,प्रदीपशेठ टेमकर, उद्योजक नवनाथशेठ अभंग, मल्हारी अभंग, संकेत धानापुणे, बाळासाहेब गायकवाड तसेच दत्त गणेश सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यापुढेही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.संतोष ढुमणे यांनी सांगितले.
नारायणगावात चोरट्यांचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद
किरण वाजगे
नारायणगाव (ता जुन्नर) येथील ओंकार सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथील दोन सदनिका (फ्लॅट) तसेच खोडद रोड येथील डॉक्टर गोसावी हॉस्पिटल समोरील संतुष्टी प्रेस्टीज येथील बंद असलेले कार्यालय व शेटे मळा येथील शुभम सोसायटी मधील एक सदनिका अज्ञात तीन चोरट्यांनी फोडली व घरातील मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार (दि. २७) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत नारायणगाव पोलिसांच्याा वतीने या चारही घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध तात्काळ घेतला जाईल असे आश्वासन नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिले. मात्र सध्या यात्रा-जत्रा उरूस व लग्नसराई असल्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षक नेमावेत तसेच वस्तीवर व एकटे राहणाऱ्या कोणीही आपापली घरे बंद करून जाण्यापूर्वी शेजाऱ्याला कळवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
दरम्यान नारायणगाव येथील जुन्नर रस्त्याजवळील ओमकार सोसायटी मध्ये राहणारे ग्रामसेवक संतोष भोसले यांची तळमजल्यावरील सदनिका व त्यांच्याच समोरच्या इमारतींमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या संजिवनी संतोष गाडेकर यांच्या बंद असलेल्या सदनिका पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी फोडण्यात आल्या. संतोष भोसले यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत घुसले असल्याचे निदर्शनास आले आहे.
खोडद रोड येथील डॉक्टर गोसावी हॉस्पिटल समोरील संतुष्टी प्रेस्टिज सोसायटीमध्ये असलेले संदीप बांगर यांचे कार्यालय व शेटे मळा येथील शुभम सोसायटीमधील सरस्वती इमारती मध्ये राहणारे वैभव पाचपुते यांची सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडून काही ऐवज चोरून नेला आहे.
दरम्यान संतोष भोसले यांच्या घरातून रोख रक्कम ५० हजार रुपये व दोन वीस हजार रुपयांची टायटन कंपनीची घड्याळे असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. तर संजीवनी गाडेकर यांच्या घरातून लहान मुलाचे सोन्याचे सुमारे एक तोळे वजनाचे दागिने व चांदीच्या पट्ट्या चोरट्यांनी पळूवून नेल्या आहेत. तर खोडद रोड येथील कार्यालय व सदनीके मधून किरकोळ ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
चालत्या बस मध्ये ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
नारायणगाव,किरण वाजगे
चालत्या बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याची घटना नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आज (दि. २७ रोजी) दुपारी घडली आहे.
साक्री पुणे ही बस आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव जवळ आली असताना आळेफाटा येथे बसलेल्या एका तरुण प्रवाशाचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील साक्री येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव जवळ येताच अमित अरविंद घोलप (वय ३७, रा. गुरुवार पेठ, धनगर आळी पुणे) हे प्रवासी बस वरील सीटवर बसले असताना अचानक आकडी आली व ते बेशुद्ध झाले. यामुळे त्यांना बस चालक रोहिदास हरी बागुल व बस वाहक यांनी पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये आणले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णाला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जा असे सांगितले. त्याच वेळी काही प्रवाशांच्या मदतीने व रुग्णवाहिका चालक संजय भोर यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ माटे यांनी अमित घोलप यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच ते मृत्युमुखी पडले असल्याचे डॉ माटे यांनी सांगितले.
दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक संजय भोर तसेच बस चालक रोहिदास हरी बागुल यांनी मयत अमित घोलप यांना दवाखान्यात नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले मात्र उपचारापूर्वीच अमित घोलप मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या खिशात रोख रक्कम देखील होती. नेमकी ही घटना कशी घडली याबाबत बस चालक बागुल व प्रवाशांनी याबाबत माहिती दिली आहे.
या घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार संतोष दुपारगुडे व कॉन्स्टेबल कोळी यांनी केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काळूराम साबळे करत आहेत.
धामणीच्या जाधव पाटलांच्या रावण बैलाला मिळाली विक्रमी किंमत
धामणी – गेली सात वर्षे बंद असलेली बैलगाडा शर्यत सुरू झाली आणि ग्रामीण भागातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा मालकांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहेत. यात्रा जत्रांना होणारी बैलगाडा गर्दी त्यामुळे सुरू झालेले अर्थकारण आणि त्यातूनच बैलांच्या वाढत्या किमती यामुळे बैलगाडा मालक आणि शेतकरी यांचा देखील चांगला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
धामणी येथील ग्रामपंचायत सदस्य आकाश जाधव,संदेश जाधव,गणेश जाधव यांनी 4 महिन्यापूर्वी 36 हजार रुपयाला हा बैल संजय जाधव यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानंतर या रावण बैलाने अगदी कमी कालावधीत आपले नाव आणि आपल्या मालकांचे नाव संबंध पुणे जिल्ह्यत प्रस्तापित केले होते. काल अखेर रांजणगाव गणपती येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक सर्जेराव खेडकर यांनी तब्बल २१ लाख रुपये देऊन या बैलाची खरेदी केली. परिसरातील आजवरची ही विक्रमी किंमत असल्याचे बोलले जात आहे.
आम्ही या बैलाची शिस्तबद्ध पळी आणि अजून तब्बल दहा वर्षे पाळण्याची क्षमता असल्याने आम्ही त्याला एवढी रक्कम दिल्याचे सर्जेराव खेडकर यांनी सांगितले.
यावेळी आकाश जाधव,संदेश जाधव,गणेश जाधव ,आनंदा जाधव,संजय जाधव,रंगनाथ जाधव ,गणेश जाधव हे उपस्थित होते.
बैलांच्या वाढत्या किंमती आणि त्यामुळे सामान्य बैलगाडा मालकांना मिळणारा नफा नक्कीच कौतुकास्पद आहे. बैलगाडा शर्यत परंपरा शेकडो वर्षापासून आपण आजवर अतिशय पारंपरिक पद्धतीने जोपासत आहे. आजचा तरुण वर्ग जास्त प्रमाणात बैलगाडा क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. परंतु या तरुण वर्गाने आपला कामधंदा पाहून आपले कुटुंब पाहून ही परंपरा जपली पाहिजे. जाधव मंडळींना बैलाची चांगली रक्कम मिळाली त्यांचे देखिल अभिनंदन शिरदाळेचे उपसरपंच श्री.मयुर सरडे यांनी केले.
आगामी उन्हाळी सुटयांसाठी एमटीडीसी पर्यटकांना देणार निखळ आनंदाबरोबरच विविध सोयी-सवलती
पुणे- आगामी मे महीन्याच्या सुटयांसाठी महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ आखणी करीत असुन पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी आणि सवलती देणार आहे.
कोरोना नंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट नव्या दमाने खुली झाली असुन महामंडळाचे कर्मचारी आदरातिथ्य आणि विविध उपक्रमांचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेवुन तयार झाले आहेत. पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर महामंडळाने मोठया प्रमाणावर पर्यटकांची सोय केली असुन तब्बल 2 वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद दिला आहे. आगामी पर्यटक हंगाम आणि सुटटीसाठी आतापासुनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसुन येत आहे. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे.
आगामी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही सुटयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट”चीही सुरवात दि. 01/10/2021 पासुन सुरु केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत.
शाळांना मिळणाऱ्या सुटयांमुळे आणि आगामी उन्हाळी सुटटीचा हंगाम द्विगुणित करण्यासाठी एमटीडीसी कडुन पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे.