घोडेगाव पोलिस स्टेशनचे दबंग अधिकारी api जीवन माने यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त
घोडेगाव : -मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त झाला आहे
घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या साठी अनेक लोकाभिमुख उपक्रम सुरू करून अनेक अवघड व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली.
अवैध्य व्यवसायावर व गुन्हेगारांच्यावर प्रभावी कारवाया केल्या त्यांच्या सर्वसमावेशक कामगिरीमुळेच त्यांना आज अमिताभ गुप्ता आयुक्त पुणे शहर, यांच्या उपस्थितीत डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या हस्ते ‘Big Salute Award’ देवून गौरविण्यात आले.
“संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल”
उरूळीकांचन, पुणे
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशन द्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला . तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण भारतातील अनेक राज्यांच्या विविध शहरांमध्ये दिवसेंदिवस या वृक्ष लागवडीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे .
या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील नानगाव ब्रँच मधील खुटबाव, लोणावळा ब्रँच मधील कामशेत, पाषाण (सुतारवाडी), कोरेगाव मुळ येथे १५००० पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले आहेत. या वर्षी देखील मिशनच्या माध्यमातून १४ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या विविध शहरांमध्ये अनेक नव्या ठिकाणाचा समावेश होत आहे . यादिवशी पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथील भवरापूर या ठिकाणच्या वननेस -वन प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. वन विभागाकडून वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी ५७ एकर जमीन उपलब्ध झाली असून आजच्या दिवशी आठ एकरमध्ये १५००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील या कार्यामध्ये खूप सहयोग लाभत आहे.
संत निरंकारी मिशनचे श्री.ताराचंद करमचंदानी पुणे झोनचे क्षेत्रीय प्रभारी, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक, संयोजक तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणासाठी जमिनीचे सपाटीकरण करणे, खड्डे खोदणे तसेच पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे कार्य गेले आठ दिवस करत आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.
हे सर्व विदित आहे की, संत निरंकारी मिशन हे एक विश्वस्तरीय आध्यात्मिक व्यासपीठ आहे जे सर्वांभूती निराकार ईश्वराची अनुभूती बाळगून प्रेम, सहिष्णुता व सद्भावपूर्ण एकत्वाच्या विचारधारेमध्ये विश्वास बाळगते. मिशनमार्फत पर्यावरण सुरक्षेसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे. वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, जल संरक्षण, घनकचरा प्रबंधन (Waste Management) आणि प्लास्टिकचा उपयोग न करणे यांसारख्या अभियानांमध्ये पुढाकार घेत आले आहे.
नर्मदे हर ग्रुपच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशनला सूचना फलकांचे वितरण
घोडेगाव – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी श्रावणी यात्रे निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गेले दोन वर्षात कोरोनामुळे भाविकांचे दर्शन झाले नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे गर्दी पहावयास मिळत आहे यातूनच प्रत्येकाला लवकर दर्शन व्हावे हीच अपेक्षा असते यातून अनेक वेळा पोलिस प्रशासना बरोबर भाविकांचे वाद होत असतात हे वाद टाळले जावे यासाठी घोडेगाव येथील नर्मदे हर ग्रुप परिवाराच्यावतीने पुढाकार घेऊन नियमांचे पालन करण्यासाठी असलेल्या सूचना फलकाचे वितरण यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आले त्यामुळे किमान प्रत्येक भाविकाला पोलिसांकडून वेगळी सूचना द्यावी लागणार नाही
यावेळी नर्मदे हर ग्रुपचे अध्यक्ष विनोद काळे सर, घोडेगाव पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने ,घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे ,कपिल काळे,अक्षय काळे,धनंजय काळंबे, नरेंद्र काळे,अंकुश काळे,पोलिस संपत कायगुडे तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते
जयहिंद इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिल्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी राख्या
नारायणगांव ,किरण वाजगे
कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या धामनखेल येथील नंदनवन या दिव्यांग मुलांच्या आश्रमाला भेट देण्यात आल्या.
शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या राखी बनवा या उपक्रमांतर्गत ३५० राख्या तयार करण्यात आल्या होत्या. या उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थी व सामान्य विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा बंध निर्माण होतो. तसेच शाळेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनांचा विकास होतो म्हणून असे सहशालेय उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे मत जयहिंद इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य डॉ. किरण पैठणकर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमासाठी सुप्रिया पांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाकरीता संचालिका अंजली गुंजाळ, इंदूमती गुंजाळ, डॉ. शुभांगी गुंजाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.