पीसीईटी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
श्रावणी कामत ,पिंपरी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) निगडी संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पीसीईटी अंतर्गत असणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या संघांसाठी आंतर पीसीईटी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पीसीसीओई संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय निगडी, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक निगडी, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय रावेत तसेच एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय रावेत या चार संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या अंतिम सामन्यात पीसीसीओई, निगडी संघाने एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय रावेत संघाचा ३-२ गोल फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
स्पर्धेचे आयोजन पीसीसीओई निगडीचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे, पीसीसीओईआर रावेतचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक मिलिंद थोरात, एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रदीप कासार यांनी केले होते.
मराठा समाज हल्ला प्रकरणाचे नारायणगाव परिसरात तीव्र पडसाद : वारूळवाडी नारायणगावात सर्वत्र कडकडीत बंद
नारायणगाव (किरण वाजगे)
जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीमार प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी नारायणगाव येथे देखील आज रविवार दिनांक तीन रोजी दुपारपर्यंत सर्व छोट्या मोठ्या व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पोलीस व शासनाचा निषेध केला.
जीवनावश्यक वस्तू व आरोग्य विषयक तसेच मेडिकल दुकाने वगळता उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या बंद मुळे कोराना काळाची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना आली.
दरम्यान बंद बाबतचे आवाहन माजी सरपंच योगेश पाटे, तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी जितेंद्र गुंजाळ, महेश शिंदे, प्रवीण पवार, कैलास वाजगे, ईश्वर पाटे, संपत शिंदे आदींनी काल गावात फिरून व सर्वांना सांगून केले होते.
आज नारायणगाव येथे बाजारपेठ, बस स्थानक परिसर तसेच गावातील सर्व ठिकाणच्या दुकानदारांनी व वारूळवाडी आनंदवाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.समस्त वारूळवाडीकर, नारायणगावकर व मराठा समाजाच्या वतीने व्यवहार बंदबाबतचे आवाहन करण्यात आले होते. याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
याच बातमी ची काही द्रूश्य पाठवली आहेत आपला….
बी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
गणेश सातव, वाघोली
वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरुण शिंदे उपस्थित होते.
शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे व स्वतःच्या शरीरासाठी रोज किमान एक तास सर्वांनी द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. खेळामुळे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते व त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खेळ व शारीरिक आरोग्य यांच्याबद्दल मार्गदर्शन करत असताना त्यांनी छोटे छोटे शारीरिक व्यायाम कसे करावे याचेही प्रात्यक्षिक करून घेतले.तसेच मेजर ध्यानचंद यांचे कार्य व त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला डॉ. अरुण शिंदे यांनी बोलत असताना मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा अशी सर्वांनी मागणी करूया असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.खाडे यांनी दिला तर प्रस्तावना प्रा. वांजोळे यांनी केली. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दूधभाते यांनी मांडले. या कार्यक्रमास प्राचार्य सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंधारे यांनी केली
बी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
गणेश सातव,वाघोली
वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरुण शिंदे उपस्थित होते.
शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे व स्वतःच्या शरीरासाठी रोज किमान एक तास सर्वांनी द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. खेळामुळे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते व त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खेळ व शारीरिक आरोग्य यांच्याबद्दल मार्गदर्शन करत असताना त्यांनी छोटे छोटे शारीरिक व्यायाम कसे करावे याचेही प्रात्यक्षिक करून घेतले.तसेच मेजर ध्यानचंद यांचे कार्य व त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला डॉ. अरुण शिंदे यांनी बोलत असताना मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा अशी सर्वांनी मागणी करूया असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.खाडे यांनी दिला तर प्रस्तावना प्रा. वांजोळे यांनी केली. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दूधभाते यांनी मांडले. या कार्यक्रमास प्राचार्य सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंधारे यांनी केली
जालना – मराठा समाज हल्ला प्रकरणाचे ग्रामीण भागातही तीव्र पडसाद ; नारायणगावात उद्या राहणार सर्व व्यवहार बंद
नारायणगाव :- (किरण वाजगे)
जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीमार प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे देखील उद्या रविवार दिनांक तीन रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. जीवनावश्यक वस्तू किंवा आरोग्य विषयक व मेडिकल दुकाने वगळता उस्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी होणार आहे. याबाबतचे आवाहन माजी सरपंच योगेश पाटे, तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी जितेंद्र गुंजाळ, महेश शिंदे यांनी केले आहे.