नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी विजय

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी) – नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी १२ जागांवर बहुमताने विजय मिळविला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी दिली.

या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे हे सर्वात जास्त मते मिळवून निवडून आले आहेत. तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे हे देखील बहुमताने निवडून आले आहेत.
या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनल व श्री मुक्ताई,हनुमान,भागेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात जोरदार लढत झाली.

ही निवडणूक एकतर्फी व बहुमताने जिंकल्यामुळे पॅनल प्रमुख सरपंच योगेश पाटे, सरपंच राजेश मेहेर, संजय वारुळे, राहुल बनकर, आशिष फुलसुंदर, माजी सरपंच अशोक पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अशिष माळवदकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
८३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोसायटीची निवडणूक झाली आहे. इतर मागास प्रवर्गातून श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे अरुण हरिभाऊ कोल्हे हे बिनविरोध निवडून आले होते

.१२ जागांसाठी झालेल्या लढतीमध्ये श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे सर्वसाधारण गटातून संतोष बबन खैरे (८१० मते), सिताराम आत्माराम खेबडे (८०९ मते), किरण लक्ष्मण वाजगे (७८२ मते), कैलास दत्तात्रय डेरे (७८१), रामदास जिजाबा तोडकरी (७४९ मते), राजेंद्र देवराम पाटे (७८९ मते), चंद्रकांत पिराजी बनकर (७१० मते), बाळासाहेब केरू भुजबळ (७३९ मते), महिला प्रतिनिधी गटातून आरती संदिप वारुळे (८९७ मते), सीमा संदेश खैरे (८३९ मते) या दोघी विजयी झाल्या तर पराभूत सुजाता जयसिंग भुजबळ यांना (५०९ मते) मिळाली. अनुसूचित जाती जमाती गटातून – मारुती जानकू काळे (८४५ मते) मिळाली तर पोपट महादू जाधव यांना (४२२) मते मिळाली, भटक्या विमुक्त जाती व विशेष प्रवर्ग गटातून – बाबाजी येड्डू लोखंडे (८४९ मते) मिळाली तर पराभूत उमेदवार येल्लू लोखंडे यांना (४५७ मते) मिळाली.दरम्यान या निवडणुकीमध्ये एकूण १९१९ मतदार होते. यातील १३८७ मतदारांनी मतदान केले. सर्वसाधारण गटातील १२९ मते बाद झाली.

सर्वसाधारण गटातील पराभूत उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे कैलास ज्ञानेश्वर पानसरे (५०८ मते), भागुजी गणपत पानसरे (४८२ मते), गणेश विलास वाजगे (४७९ मते), बबन दत्तात्रय खैरे (४५८ मते), सागर लक्ष्मण दरंदाळे (४४४ मते), जयवंत बाबुराव औटी (३५५ मते), सुरेश पांडुरंग खैरे (३५५ मते), गणेश तुकाराम तांबे (३४७ मते).महिला राखीव गटातून, अनुसूची जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती जमाती मधून अनुक्रमे ५२, १०८ व ८१ एवढी मते बाद झाली.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनलच्या वतीने मोठा जल्लोष करून आणि जेसीबी द्वारे गुलाल भंडारा उधळून विजयी उमेदवारांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Previous articleपिंपरी सांडस सोसायटीला पीडीसीसी बँकेच्या वतीने ढाल भेट
Next articleहवेलीसाठी अप्पर तहसील कार्यालय, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची विधानसभेत माहिती :  आमदार अशोक पवार यांच्या मागणीला यश