माहिती सेवा समितीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी येथे पार पडली माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळा

पुणे- शुध्द आचार, शुध्द विचार,निष्कलंक जीवन,जीवनात थोडा त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता हि पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे.कार्यकर्त्यानी माझ्या सारखे संपूर्ण जीवन त्यागून काम करायची गरज नाही.आपले घर,प्रपंच सांभाळून दिवसातून एखादा तास,आठवड्यातून एखादा दिवस समाजासाठी, समाजातील गोरगरीब,वंचितांच्या प्रश्नांसाठी दिला पाहिजे.मक्याच्या एका दाण्याला पहिले स्वताला गाडून घ्यावे लागते.नंतरचं त्या दाण्याचे भरदार कणीस तयार होते.


त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी स्वताला गाडून घेऊन निस्वार्थी काम करत रहावे असे मार्गदर्शनपर अवाहन माहिती राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जेष्ठ समाजसेवक,पद्मविभूषण आण्णा हजारे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

माहिती सेवा समिती,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राळेगण सिध्दी येथे एक दिवशीय माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आण्णांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.माहिती अधिकार कायदा,सेवा हमी कायदा व ईतर काही कायदे वेळोवेळी सरकारला जागे करुन व जनआंदोलन करुन जनतेच्या हितासाठी पारित केले.६ मंत्री व अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी हि पाठवले हे मी कायदा व न्यायव्यवस्थेद्वारे करु शकलो.कायद्यात ऐवढी ताकद आहे,कि तुम्ही हि कायद्याच्या अधारे असे काम करु शकता.

दुपारच्या दुसऱ्या सत्रात माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांनी कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायदा,कायद्याची रचना व माहिती, विविध कलमे,अर्ज कसा करावा पासून अपिल कसे करावे याबाबत माहिती दिली.प्रशांत देशमुख, राजेंद्र नाणकर व चंद्रकांत वारघडे यांनी सहभागी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून पुणे,मुंबई,सातारा, सोलापूर, नगर,नाशिक, उस्मानाबाद, लातूर,नांदेड अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून २०० कार्यकर्ते या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.सहभागी कार्यकर्त्यांना प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

या महत्वपूर्ण कार्यशाळेच्या आयोजनासाठी माहिती सेवा समितीचे संस्थापक चंद्रकांत वारघडे,शिवाजीराव खेडेकर, बाळासाहेब चौधरी,पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे, सचिव प्रशांत महाराज भागवत, प्रशांत देशमुख, राजेंद्र नाणकर(नाशिक)संतोष काळे,सागर इंगळे,शरद ढेरंगे,कमलेश बहिरट,गणेश जाधव,प्रसाद जोशी,अंकुश कोतवाल,अँड.गणेश म्हस्के(पुणे)बालाजी लंगोटे(नांदेड) यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रास्ताविक चंद्रकांत वारघडे यांनी तर,सुत्रसंचालन गणेश सातव यांनी केले व आभार लक्ष्मण गव्हाणे व प्रशांत भागवत यांनी मानले.

Previous articleयशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याची आमदार अशोक पवार यांची सहकारमंत्र्यांकडे मागणी
Next articleछत्रपतींच्या एका निस्सीम भक्ताच्या “मुकद्दर” या पुस्तकाला सबंध महाराष्ट्रात पोहचवून अभिवादन करूया