पोलिस पाटीलांना 50 लाख रुपये विम्याचे कवच लागू करण्याची आमदार राहुल कुल यांची मागणी

सचिन आव्हाड,दौंड

कोरोना महामारीच्या काळात पोलीस पाटील आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत . यामुळे पोलीस पाटलांना 50 लाख रुपये संरक्षण विम्याचे कवच लागू करण्यात यावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना (कोव्हीड १९) महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून वाढ़ता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने गावपातळीवर समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये गाव कामगार पोलीस पाटील हे सदस्य / सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असताना जळगाव जिल्ह्यातील चार पोलीस पाटलांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेला आहे.

सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात वेगाने फैलावत आहे. यात पोलीस पाटील आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना ५० लाख संरक्षण विम्याचे कवच लागू करण्याची मागणी त्यांनी केलेली असून, कोरोना (कोव्हीड १९) अंतर्गत काम करणाऱ्या गाव कामगार पोलीस पाटील यांना ५० लाख रुपये विमा संरक्षणामध्ये समाविष्ट करणेबाबत आपणाकडून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार , गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे .

Previous articleतमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाच्या वतीने नारायणगावात उपोषण
Next articleव्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना वर मात करण्यासाठी दौंड तालुक्यात एकवटले तरुण