भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे पुणे येथे स्वागत

कुरकुंभ ,सुरेश बागल

कोरोना परिस्थिती नंतर काही ऊद्योग व कामगार क्षेत्रातील परिस्थिती आव्हानात्मक निर्माण झाली आहे. काम व वेतनातील अस्थिरते मुळे कामगार क्षेत्रात भिती चे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य चे श्री सुरेश खाडे यांची भारतीय मजदूर संघाच्याे शिष्टमंडळाने पुणे येथे भेट घेऊन मा कामगार मंत्री यांचे स्वागत व अभिनंदन केले.
तसेच कामगारांचे खालील महत्वपूर्ण प्रश्न आव्हाने करिता संघटनेचे पदाधिकारी समावेत मिटींग ची मागणी केली आहे.

१) असंघीटत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना तयार करून लागु करण्यात यावी.

२) कंत्राटी कामगारांना रोजगारात सुरक्षा करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनात कामाच्या अनुभवा नुसार वाढ करण्यात यावी व झालेल्या कामाची ग्रजुईटी देण्यात यावी.

३) महाराष्ट्र शासनाने किमान वेतन कायद्यानुसार १७ / १८ शेल्डुल ऊद्योगातील कामगारांचे कायद्यानुसार ५ वर्षापूर्वी पुर्ननिर्धारण करणे कायदेशीर बंधनकारक होते. पण या ऊद्योगातील किमान वेतनची मुदत संपुनही ७ ते ८ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. शासनाने अंमलबजावणी केली नाही त्यामुळे कामगारांना कमी वेतन मिळत आहे. तरी किमान वेतन कायद्यानुसार नुसार पुनःनिर्धारण करून फरका सहित रक्कम कामगारांना मिळावी.
४) महाराष्ट्र शासनाने सर्व कामगारांना ई ऐस आय व पी फ योजना लागु करून कामगारांचे अंशदान रक्कम महाराष्ट्र शासनाने भरावे.
५) भारतीय मजदूर संघाने लेबर कोड नियम, या बाबतीत घेतलेल्या हरकती व सुचनांचा बाबतीत भारतीय मजदूर संघाच्या समावेत त्रिपक्षीय चर्चा आयोजित करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा.

यावेळी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात भारतीय संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, असंघीटत प्रभारी उमेश विस्वाद, पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, मुंबई अध्यक्ष बापू दडस, शासकीय कर्मचारी संघटनेचे राधेश्याम कुलकर्णी, विवेक ठकार , श्रीपाद कुटासकर, हिंदुस्थान अॅन्टोबायटीस्स कंपनीतील संघटनेचे सेक्रेटरी विजय पाटील उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात कॅफे अल्पवयीन मुला-मुली़चे अश्लील चाळे;कॅफे चालकांवर गुन्हा दाखल
Next articleमहात्मा गांधी विद्यालयाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षानी घेतला मेळावा : शिक्षकांनी केले मार्गदर्शन