मुंबई डिव्हिजन रेल्वे सुरक्षा बलाच्या बुलेट रॅलीचे लोणावळ्यात स्वागत

लोणावळा , श्रावणी कामत

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल रेल्वे मंत्रालयातर्फे “आजादी का अमृत महोत्सव ” साजरा केला जात आहे . या उपक्रमाबद्दल मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजन कडून जितेन्द्र श्रीवास्तव वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त रेल्वे सुरक्षा बल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनात्मक बुलेट रैली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 10 रोजी सुरु करण्यात आली ती आज दुपारी 3 वाजता लोणावळा येथे आल्यानंतर आरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सिंह व उपनिरिक्षक नंदलाल यादव , आरपीएफ चे सहाय्यक उपनिरीक्षक , लोणावळा आनंद जैसवाल यांनी बुलेट रैली मध्ये सामिल झालेल्या बल सद्स्यांचे पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन स्वागत केले.

तसेच लोणावळा येथील कैवल्य धाम शाळेच्या प्रिंसिपल आणि रणजीत सिंह वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरपीएफ लोणावळा यांच्या कडुन हिरवा झेंडा दाखवून बुलेट रैली ला कर्जत कडे रवाना केले , या निमीत्ताने शाळेतील विध्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल . राष्ट्रीय एकता व सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी बुलेट रैली ही लोणावळा प्रमाणेच सर्व महत्त्वाच्या स्थानकांवरून जाणार आहे.

Previous article19 वर्षीय पर्यटक भुशी धरणात बुडाला
Next articleबैलगाडा शर्यंतीचा थरार आता रुपेरी पडद्यावर