पुणे-नाशिक महामार्गावर वडाची फांदी उन्मळून पडली;संबंधित विभागाचे दुर्लक्ष

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील वारूळवाडी हद्दीमध्ये कलासागर मंगल कार्यालयासमोरील वडाच्या झाडाची फांदी आज सकाळीं उन्मळून पडली आहे.

मात्र अर्ध्या रस्त्यात ही फांदी सकाळपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत तशीच पडून आहे. ही फांदी हटवण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथवा वनाधिकाऱ्यांनी दाखवले नाही. त्यामुळे येथे वाहतुकीला काही काळात अडथळा निर्माण झाला.
येथे फांदी तुटल्यामुळे काही काळ ट्रॅफिक जाम ची समस्या निर्माण झाली. तसेच काही दुचाकीस्वार अपघातामुळे किरकोळ जखमी झाले आहे.

Previous articleटेमघर येथील गरजू कुटुंबांना संसारोपयोगी जीवनावश्यक साहित्याचे वाटप
Next articleरेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल भुजबळ भारत युवा पुरस्काराने सन्मानित