सरपंच परिषदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

दिनेश पवार,दौंड

सरपंच परिषद मुंबईच्या एका १४ सदस्यीय शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा.मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या राज्यातील ३५ पेक्षा अधिक सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.


यावेळी सरपंच परिषदे मुंबई प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सरचिटणीस विकास जाधव विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह हिंगणी-बेर्डीच्या सरपंच मनिषा संभाजी यादव उपस्थित होते

Previous articleसडक संस्थेच्या वतीने कोरोना जनजागृती
Next articleजिल्हा परिषद शाळेचे ध्येयवेडे शिक्षक नागनाथ विभूते यांना राष्ट्रीय आयटी टीचर पुरस्कार जाहीर