उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

उरुळी कांचन

उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे मागील वर्षातील कार्य हे गावच्या विकासाला वेगळी दिशा देणारे आहे. असे प्रतिपादन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी केले.उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन’ संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण व ससून ब्लड बँकेची रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन येथील बी.जी. शिर्के बाल विकास मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणुन प्रा. के. डी कांचन बोलत होते.या रक्तदान शिबिरात ४७६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात ४४९ पुरुष व २७ महिलांचा समावेश होता. प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पूरक तुळशीचे रोप, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, सरपंच राजेंद्र बबन कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, उपसरपंच अनिता तुपे, माजी उपसरपंच संचिता कांचन, पुणे प्राईम न्यूजच्या संचालिका ऍड. आकांक्षा दांडगे, रेल्वे क्षेत्रीय समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, राजाराम कांचन, ग्रामपंचायत सदस्य सुनील तांबे, सीमा कांचन, मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, प्राचार्य भारत भोसले, आदित्य कांचन, अलंकार कांचन, भाऊसाहेब तुपे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, शांताराम चौधरी, किरण वांजे, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, शिवाजी नवगिरे, रमेश महाडिक, सोमनाथ बगाडे, महादेव काकडे आदि मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दरम्यान, मागील आठ वर्षापासून हा ग्रुप उरुळी कांचनसह परिसरात संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, हजारो झाडे लावून संवर्धन करण्याचे काम पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचे कार्य जोमाने करीत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर व पालखी मार्ग स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या काळात मार्च २०२० ते मे २०२१ बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय आणि ग्रूपच्या वतीने चार वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सुमारे ८७७ रक्त पिशवीचे संकलन करून आरोग्यक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. उरुळी कांचन ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक रक्तदात्यास झाड आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

Previous articleखेड प्रांताधिकारी कार्यालयाजवळ शाळकरी विद्यार्थ्याने वाचवला मुक्या जीवाचा प्राण
Next articleस्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई, नवीन वर्षाच्या प्रारंभी जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस