जयश्री मंगवडे यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान

दिनेश पवार : दौंड

राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनामध्ये दौंड येथील जयश्री आप्पासाहेब मंगवडे यांना आदर्श उद्योजिका कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, पंधराव्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष अविनाश ठाकरे,दशरथ यादव,विजय तुपे व इतर मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

जयश्री मंगवडे या उच्च शिक्षित असून सरकारी नोकरी न करता त्यांनी व्यवसाय सुरू केला, यातून तरूणींना कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजिका प्रशिक्षण देऊन कित्येक तरूणींना त्यांनी स्वतः च्या पायावर उभे केले आहे,शून्यातून लाखोंचा व्यवसाय त्यांनी उभा केला आहे, तसेच सामाजिक कार्यात देखील त्या सहभागी असतात त्यांच्या या कार्यामुळे आदर्श कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, यामुळे परिसरातून जयश्री मंगवडे यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा
Next articleटीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारहकांनी केला एकाच दिवशी पहिणे नवरा नवरी सुळका सर: