कोविड काळात , अपघातात कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या प्रकाश दुतांचे पणत्या लावून स्मरण

कुरकुंभ : सुरेश बागल

कोरोना काळात राज्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सर्व वृत्तांचे कव्हरेज करणारे टीव्ही, मीडिया / वृत्तपत्र कार्यालये , कारखाने, संरक्षण ऊद्योगातील कारखाने, हॉस्पिटल,मेडिकल, लॅबोरेटरीज मेडिकल, सर्व अत्यावश्यक , कारखाने, औषधी सेवांची दुकाने,शासन व पोलीस यंत्रणा विविध अत्यावश्यक उद्योग आणि सर्व नागरिकांना वीज आवश्यक होती. कोरोना काळामध्ये २४×७ अखंडित वीजपुरवठा करण्यात मोलाचा वाटा असलेले महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील अनेक अधिकारी, कायम कामगार, तसेच तिन्ही कंपनीतील नियमित रिक्त पदाच्या जागेवर कार्यरत असलेले सुमारे ७० कंत्राटी कामगार हे कोरोना काळामध्ये कर्तव्यावर जनतेला वीज सेवा देताना अपघातात शहिद झाले.

या ७० शहीद वीज कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणताही निधी , नुकसान भरपाई म्हणून रक्कम देण्यात आलेली नाही. दिवाळीच्या पूर्व संध्येला अशा सर्व शहीद प्रकाश दूतांचे स्मरण ७० दीप लावून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघाने) केले आहे.

या कामगारांच्या कुटुंबियांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. तरी कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना ऊर्जामंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी व समस्यां जाणून घेण्यासाठी संघटने सोबत एक बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी पुणे प्रादेशिक संचालक पुणे विभाग महावितरण कार्यालय प्रकाश भवन सेनापती बापट रोड पुणे येथे दि. २३ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी सात वाजता झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात यांनी केली आहे.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे,व सचिव निखिल टेकवडे व तुकाराम वाल्हेकर इत्यादी उपस्थित होते.

Previous articleरस्त्याच्या मध्यभागी गुडघाभर खड्डे असल्याकारणाने मानवी जीवन धोक्यात – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे
Next articleअर्थसंपदा पतसंस्थेकडून निराधार कुटुंबांना किराणा वाटप