वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्रात २२ डिसेंबरला करणार आंदोलन

कुरकुंभ : सुुुरेेेेश बागल

नागपूर अधिवेशनात केली घोषणा
महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ( संलग्न भारतीय मजदूर संघ) चे महाराष्ट्र राज्या चे अधिवेशन रेशीम बाग नागपूर येथे संपन्न झाले. अधिवेशन कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर, समस्या बाबतीत अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या मध्ये जेष्ठ मार्गदर्शक अण्णा देसाई यांनी मार्गदर्शन करताना वीज ऊद्योगात कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करण्यासाठी रोंजदारी कामगार पध्दत प्रमाणे कामगारांना न्याय देण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन मार्गदर्शन करताना केले आहे.

यावेळी अधिवेशन मध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहु न शकल्याने व्हिडिओ संदेशा व्दारे मा राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी मार्गदर्शन केले, तसेच उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडीओ संदेशा व्दारे कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर, समस्यांच्या बाबतीत मागील दोन अडीच वर्षात त्रास झाला, समस्यांचे निराकरण झाले नाही पण आता सर्वसामान्य चे सरकार आले असुन प्रलंबित प्रश्नांबतीत बाबतीत सरकारचे दरवाजे खुले आहेत तरी प्रश्नांबतीत चर्चा करूयात असे मनोगत व्यक्त केले आहे.
तसेच कोथरुड पुणे माजी आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे. कामगारांच्या समोर कार्यकर्ता या विषयांवर अरविंदजी कुकडे प्रांत सह संर्पक प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.

कामगार महासंघाचे पुर्व महामंत्री श्री शंकरराव पहाडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की मागील वेतन वाढ कराराच्या वेळी कायम कामगारांच्या समावेत कंत्राटी कामगारांना २०% वेतन वाढ मिळाली होती, या वेळी सुध्दा कंत्राटी कामगारांना रोजगारात स्थैर्य व वेतन वाढ मिळालीच पाहिजे असे प्रतिपादन केले आहे.
या वेळी महत्वपूर्ण ठराव एकमताने संमत झालेले आहेत.
१) समान कामाचे समान वेतन द्यावे. व कायम नोकरीत घेण्यात यावे.
२) विज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या करिता वीज ऊद्योगात धोकादायक ऊद्योग असल्याने स्वःतत्र वेतन श्रेणी निर्माण करावीत.
३) शासनाच्या परिपत्रक नुसार कंत्राटी कामगारांना वीमा पत्र योजना राबविण्यात यावी.
४) कंत्राटी कामगारांना ग्रजुईटी ती तरतुद करण्यात यावी.
५) ई ऐस आय कडून सर्व जिल्हा मध्ये सुपरस्पेट्यलिटीचा लाभ मिळावा .
६) अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून २० लाख रू. व वारसांना कायम नोकरीत समाविष्ट करावेत.
या अधिवेशनाचा समारोप करताना क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश यांनी भारतीय मजदूर संघ ही सर्वात मोठी संघटना आहे. कंत्राटी कामगारांच्या समस्या मोठ्या आहेत त्याचे निराकरणकरण्यासाठी भारतीय मजदूर संघ सतत प्रयत्नशील आहे. अध्यक्षीय संबोधन करताना श्री. नीलेश खरात यांनी कामगारांनी काम करताना नहीं डरेंगे नहीं झुकेंगे बढते जाये आगें हम । अशीच भुमिका घेवून शोषित पिडीत कामगारांना न्याय देण्यासाठी संघटना ज्या ज्या वेळी आवाज देईल तेंव्हा कामगारांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवहान केले आहे.

या समारोप प्रसंगी यावेळी पुढील कालावधी करिता नवीन कार्यकारिणी ची घोषणा संघटनेचे पालक मंत्री श्री सुभाष सावजी यांनी घोषित केले. या वेळी मंचावर क्षत्रिय संघटन मंत्री मा सी व्ही राजेश, अध्यक्ष श्री नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री उमेश आणेराव, कार्याध्यक्ष अमर लोहार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष सागर पवार यांनी केले व आभार प्रदर्शन सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले.

नवीन कार्यकारिणी अध्यक्ष श्री नीलेश खरात
महामंत्री श्री. सचिन मेंगाळे उपमहामंत्री श्री. राहूल बोडके संघटनमंत्री श्री.उमेश आणेराव
कोषाध्यक्ष श्री. सागर पवार कार्याध्यक्ष श्री. अमर लोहार यांची निवड करण्यात आली आहे.

पाच उपाध्यक्ष, पाच सेक्रेटरी , महिला उपाध्यक्ष,निवासी सचिव व कंपनी नुसार कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

Previous articleकनेरसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप
Next articleहवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार धनराज साळूंके यांचे निधन