उरुळी कांचन ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ७९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर

उरूळी कांचन- ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ७९ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या निधीची शासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी दिली आहे. उरुळी कांचन येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषापेक्षा जास्त आहे. तसेच योजनेची किंमत रू ५ कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सदर नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग पुणे यांनी संदर्भ क्रमांक ०९ अन्वये शासनाच्या मान्यतेकरीता सादर केला होता.

प्रस्तुत नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दिनांक ६ डिसेंबर, २०२१ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ७९ कोटी ५३ लाख २ हजार (अक्षरी रूपये एकोणऐंशी कोटी त्रेपन्न लाख दोन हजार फक्त) (ढोबळ) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार उरुळी कांचन येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये ११ हजार ४४४ इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी शासन निर्णय पुरवठा योजनेच्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर संबंधित कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण/जिल्हा परिषद व संबंधित ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी योजनेची संयुक्तपणे पाहणी आयोजित करावी आणि अशा पाहणीत कोणतेही दोष आढळून आल्यास योजना ताब्यात देण्यापूर्वी ते सुधारण्यात यावेत. २ रा योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर किमान १ वर्षे योजना चालविणे कंत्राटदारावर राहील. असे परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, १० जानेवारी रोजी दिलेल्या राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी रवींद्र भराटे यांच्या स्वाक्षरीने प्रशासकीय मंजुरी दिलेले परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर ती संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडून योजना प्रत्यक्षात पूर्ण झाली या आशयाची सुचना मिळाल्यानंतरच्या एक महिन्याच्या आत योजना ताब्यात घेण्यास संबंधित ग्रामपंचायत जबाबदार राहील. प्रस्तुत नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दिनांक ६ डिसेंबर, २०२१ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे.

Previous articleकेंद्र सरकारने जाहीर केलेला २०२२ चा अर्थसंकल्प हा कामगारांची निराशा करणारा
Next articleप्रा.नितीन बटुळे सेट परीक्षा उत्तीर्ण: मराठी विभागाच्या वैभवात मानाचा तुरा