Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
घोडेगाव : –
कोटमदरा (ता.आंबेगाव) येथे,दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही,नयन मनोहर श्री दत्त मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोटमदऱ्याचा हा परिसर खरच अभुतपुर्व नजरा आहे असे दर्शणासाठी आलेले भाविक सांगतात.साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार संचलित श्री स्वामीदत्त आबालवृद्धाश्रम या ठिकाणी संस्थे अंतर्गत सलग सात वर्षापासुन समाज सेवेची विविध प्रकारची कामे व उपक्रम करण्यात आली असल्याची माहिती निलेश गोडबोले यांनी दिली.
यावेळी सकाळी सामुहिक संकल्प व गणेश पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री दत्त पादुका अभिषेक संपन्न झाला.यावेळी सर्व भाविक -भक्तांच्या उपस्थितीत महाअरती घेण्यात आली.त्यानंतर परमपुज्य पदमाकर जोशी यांनी दत्तात्रयाच्या मंत्राचे मार्गदर्शन केले.तसेच सुंदर असे मनोगत ही केले त्यामुळे आलेले सर्व भाविक-भक्त मंत्रमुग्ध झाले.उपस्थीतांचा व देणगीदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर प्रकाश तेंडूलकर यांची दत्त भजने संपन्न झाली.यासर्व कार्यक्रमाचे आयोजन साई जनसेवा संस्था,श्री स्वामी सर्मथ परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीदत्त आबाल वृध्दाश्रमात चार अनाथ मुले आणि सहा वृद्ध महिला सध्या राहत असून संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायण गायकवाड यांचे वडील,श्री नारायण गायकवाड यांनी दहा गुंठे जागा या श्री स्वामी दत्त आबाल वृध्दाश्रमासाठी व श्री दत्त मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली आहे.या आबाल वृद्धाश्रमातील बालक आणि वृद्धासाठी सेंद्रिय प्रकारची शेती करून अन्न पिकवले जाते.शेतीच्या पाण्यासाठी व श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रमासाठी विहिरीचीही व्यवस्था केली असल्याचे दिसून आले आहे.तसेच या ठिकाणी सुरू असलेली गोपालप्रिय गो शाळा देखिल महत्वपुर्ण आहे. तसेच अन्नछत्राची या ठिकाणी फक्त ६ दिवसातच उभारणी करण्यात आली असून ८० X ३० चा संपुर्ण परिसर असुन ७०० ते ८०० नागरिक मावतील येवढा प्रशस्त हॉल आहे.भविष्यात गोरगरीब लोकांच्या लग्नासाठी मोफत वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश नारायण गायकवाड यांनी दिली.
तसेच राजेंद धस पुणे यांच्याकडुन लाकडी तेलघाणा व्यवसाय हा श्री स्वामीदत्त आबाल वृद्घाश्रमास भेट देण्यात आला असुन त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.आदिवासी भागातील आत्यंत दुर्बल अशा कुटुंबात दिपावली साजरी व्हावी म्हणून संस्था दरवर्षीवाडी वस्तीवर जाऊन प्रत्येक कुटूंबाला कपडे,गृहउपयोगी वस्तु, खेळणी व फराळ वाटप करत आहे.व २२ ते २५ शाळांना शालेय साहित्याचे वाटप केले जात आहे. तसेच थंडीत बेघर व गोर-गरिब २५ ते ३० कुंटुबाला ब्लँकेट व चादरचे वाटप केले जाते.असे नवनविन उपक्रम सातत्याने संस्था दरवर्षी राबवत असुन दानशुर व्यक्तीनी या समाज कार्यास सहकार्य करावे असे अवाहन श्री नारायण गायकवाड यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.