पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शेतकऱ्याची आत्महत्या

नारायणगाव : (किरण वाजगे) :- आळे (ता.जुन्नर) येथे शेतक-याने कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील अरविंद शांताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे चुलत दाजी दशरथ लक्ष्मण केदारी (वय ४२) हे आमच्या मळ्यात रहात असून माझा चुलत भाऊ सागर वाघमारे याने फोन करुन सांगितले की, दाजी दशरथ केदारी हे घरी नसल्याने शोध घेतला असता शोध लागला नाही त्यांचा शोध घेत असताना त्यांचे शर्ट,चपला, मोबाईल शेत तळयाच्या कडेला काढुनी ठेवले होते त्यानंतर शोध घेतल्यानंतर ते शेततळ्यात मृतावस्थेत सापडले . पोलीसांना पंचनामा करत असताना केदारी यांनी विषप्राशन केल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान दशरथ लक्ष्मण केदारी याने आत्महत्या करण्याचा अगोदर एक चिठ्ठी लिहुन ठेवली होती त्यामध्ये असे लिहीले आहे की मी जिवानास कंटाळलो असुन शेतीच्या कुठल्याच पिकाला बाजारभाव मिळत नसुन कोरोणा काळात बाजारभाव मिळाला नाही त्यातच अती पावसाने पिके वाया गेल्याने हाताला काम नसल्याने खर्चाची मारामार झाली त्यात देणेदारी वाले थांबायला तयार नाही कांद्याला योग्य भाव नाही आम्ही भिक मागत नाही काय करायचे ते सांगा .

मोदी साहेब तुम्ही शेतीला हमीभाव दिला पाहीजे.तुम्हाला शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही शेतकरी काय करेल फायनन्स वाले दम देतात, पतपेढीवाले अपशब्द वापरतात. आम्ही कोणाकडे दाद मागायची शेतकरी सारखा जुगार कोण खेळत नाही आज मी आत्महत्येस प्रवृत्त आहे ते तुमच्या नाकर्तेमुळे. आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या असे लिहीले असुन शेवटी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी साहेब असे लिहीले आहे.

Previous articleग्रामीण भागात वेस्ट मार्केट वेबसिरीजच्या माध्यमातून समाजप्रबोधन
Next articleमहाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यपालांची भेट घेऊन दिले अधिवेशनाचे निमंत्रण