अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला शेतकरी बांधव नुकसान, भरपाई पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये – आमदार अशोक पवार

उरुळी कांचन

शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर परतीच्या पावसाने नुकसान झाले असून कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई पंचनामे पासून कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये यांची विशेष दखल कृषी विभागाने घ्यावी यासंदर्भात गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य घ्यावे असे आवाहन शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत मध्ये बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीत कृषी विभागाच्या संबंधित आधिकारी वर्गाला आवाहन केले.यावेळी तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील उपस्थित होत्या.

यावेळी उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, पु.जि.नि.स.सदस्य संतोष कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, माजी सरपंच संतोष कांचन, सरपंच विठ्ठल शितोळे, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, शंकर बडेकर, सुनिल तांबे, सुभाष बगाडे, माजी सरपंच आण्णा महाडिक, आदित्य कांचन, अमित चौधरी, अर्जुन कांचन, शहर अध्यक्ष रामदास तुपे, तालुका अध्यक्ष ओबीसी सुभाष टिळेकर, मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मंडळ कृषी अधिकारी जि. के.कडलग, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, जगदीश महाडिक, राजेंद्र बगाडे, राजेंद्र टिळेकर, आप्पा डोंबे, दत्तात्रय काकडे, पोलीस पाटील वर्षा कड, विजय टिळेकर, पत्रकार सुनिल जगताप, सुवर्णा कांचन, जयदीप जाधव, नितीन करडे सह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

पंचनामे करत असताना किंवा शासकीय अनुदान संदर्भात पिकपाहणी नोंद न झाल्याने येणाऱ्या अडचणी संदर्भात अनेक शेतकरी बांधवांनी प्रश्न उपस्थित केला. याबद्दल लवकरच जनजागृती बाबतीत मेळावा घेण्याचे तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी सांगितले.

Previous articleनारायणगावात मध्यरात्री दीड वाजता सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन
Next articleजेष्ठ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे वृद्धापकाळाने निधन