कवडीपाट ते कासुर्डी टोलनाक्यापर्यंत पुणे सोलापूर महामार्गावरील रखडलेली कामे पूर्ण न झाल्यास तीन ते चार दिवसात आमरण उपोषण करणार- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

कुरकुंभ: प्रतिनिधी, सुरेश बागल

कवडीपाट ते कासुडी॔ टोलनाक्यापर्यंत रस्त्यावरील अडचणी खासदार, आमदार, अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंजूर झाले आहे तरीही लवकरात लवकर त्या अडचणी पुर्ण कराव्यात अन्यथा तीन ते चार दिवसात आमरण उपोषण करणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे .

कवडीपाट टोलनाक्यापासून ते कासुडी॔ टोलनाका एक्स्प्रेस महामार्गाची दुरवस्था झाली आहे साईडपटयावर भरपूर प्रमाणात माती, वाळू साचणे – तसेच झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत, लोखंडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असणे, मधील दुभाजकाची उंची कमी होणे, रस्त्यावर मध्यभागी भरपूर प्रमाणात खड्डे पडणे, टोलनाक्यावर जड वाहने जाऊन डांबराची उंची कमी – जास्त झाली आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने साईडपटयावर माती साचलेल्या जागेवर भरपूर प्रमाणात चिखल झाला आहे त्यामुळे टू व्हीलर गाड्या घसरून १०-१२ मोठे अपघात होऊन जीवही गेलेला आहे तसेच काही जणांना अपंगत्व आले आहे व पाऊस उघडल्यावर मोठ्या गाड्या जाऊन भरपूर धुरळा उडत आहे त्यामुळे टु व्हीलर गाड्या वाल्यांच्या डोळ्यात भरपूर घाण जाऊन अपघात घडत आहेत.

तरीही खासदार, आमदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत नाहीतर असं नको व्हायला की फक्त बैठकीत घोषणा करण्यात येते पण प्रत्यक्षात काम १-२ वर्षे चालायचं तरी असं न होता लवकरात लवकर रस्त्यावरील अपघातजन्य त्रुटी आहेत त्या लवकरच दुर व्हाव्यात. असे सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी म्हटले आहे.

Previous articleखासदार डाॕ. अमोल कोल्हे यांनी पुणे- सोलापूर महामार्गाची केली पाहणी
Next articleतब्बल बत्तीस वर्षांनी भरला, इयत्ता दहावीचा वर्ग