गौ रक्षा व युवा सबलीकरणासाठी युवकांनी प्रयत्न करावेत – डॉ.इंद्रेश कुमार

नारायणगाव (किरण वाजगे)

गो ररक्षा, युवा सबलीकरणासाठी युवकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉ.इंद्रेश कुमारजी यांनी केले.महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, समाज कल्याणासाठी समर्पित असणारे व्यक्तिमत्व युवा सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे मंत्रालय,भारत सरकार चे सदस्य विशाल भुजबळ यांनी मुंबई येथील आरएसएस कार्यालय, यशवंत भवन,मध्ये आदरणीय डॉक्टर इंद्रेश कुमार जी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी गौरक्षा,युवा सबलीकरण तसेच पर्यावरण संरक्षण व अन्य विषयांवर विस्तृत चर्चा करताना ते बोलत होते.

श्री.भुजबळ यांनी स्वतःच्या गौरक्षा व देशातील युवा वर्गाच्या सबलीकरणाच्या हेतूने चालू असणाऱ्या विविध सामाजिक कार्यांची, उपक्रमांची माहिती त्यांना दिली. विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच गेल्या काही वर्षापासून विशाल भुजबळ हे गाईंचज संरक्षण व त्यांच्या संगोपनासाठी निष्ठेने कार्यरत आहेत. वृद्ध व सोडून दिलेल्या भाकड गाईंना आसरा देऊन त्यांच्या पालनपोषणाची व योग्य त्या वैद्यकीय उपचाराची सोय गो-शाळेमार्फत उपलब्ध करून देतात, आतापर्यंत विशाल भुजबळ यांनी अशा हजारो गाईंचे संरक्षण, संवर्धन करून आजच्या युवकांसमोर भारतीय समाज आणि संस्कृती यांचे आदर्शवत उदाहरण प्रस्तुत केले आहे. नुकताच त्यांना त्यांच्या सामाजिक उत्थानाच्या कार्याबद्दल दिल्ली येथे “भारत युवा पुरस्कार २०२१” ने सन्मानित झाल्याबद्दल डॉक्टर इंद्रेश कुमारजी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी ते म्हणाले “विशाल यांच्या सारख्या युवकांच्या हातानेच देशाचा विकास होऊ शकतो व देशाचे भविष्य तेच ठरवू शकतात. युवकांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने उपयोग झाला तर विविध क्षेत्रांमध्ये देशाची प्रगती अतिशय वेगाने होऊ शकते.आपणच आपला धर्म आणि संस्कृती यांची रक्षा करू शकतो. गौ रक्षणासाठी विशाल भुजबळ यांचे हे प्रयत्न बघून मला अतिशय आनंद होत आहे.

यशवंत भवन येथे झालेल्या या विस्तृत बैठकी बद्दल डॉक्टर इंद्रेश कुमार यांचे आभार व्यक्त करताना विशाल भुजबळ यांनी म्हटले की, “डॉक्टर इंद्रेश कुमार यांची भेट होणे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. गौरक्षा, युवा सबलीकरण, पर्यावरण संरक्षण या बरोबर अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करता आला तसेच विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेता आले. त्यामुळे मला आता अधिक सहज व प्रेरित झाल्याचा अनुभव होत आहे ” युवकांना आपले विचार, धोरणे व्यक्त करण्यासाठी, आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवून आणण्यासाठी योग्य त्या मंचाची गरज आहे. कारण आपल्या देशातील प्रतिभा हाच आपल्या देशाचा अनमोल वारसा आहे. आपल्याला देशातील युवकांना शिक्षण, सेवा व राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेतलं पाहिजे.  ”
पुढे बोलताना ते म्हणाले की, याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी “ग्रीनडॉट  फॉउंडेशन व मल्टिपर्पज ऑर्गनायजेशन” ची स्थापना केली आहे, ज्याचा एकमात्र उद्देश लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करून त्यासाठी प्रेरित करणे हा आहे, याचाच एक भाग म्हणून दरवर्षी पावसाळ्यात हजारो झाडे ते लावतात.

Previous articleचाकणमध्ये नगरसेवकाकडे १५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल, पत्रकारासह एकाला अटक
Next articleएक रक्तदान आपल्या जिवलगांसाठी – वाजगे आळी गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम