पंचवीस वर्षानंतर भरला पुन्हा इयत्ता बारावीचा वर्ग

नारायणगाव (किरण वाजगे)

पंचवीस वर्षांपूर्वी इयत्ता १२ वी कला शाखेत असणारे विद्यार्थी पुन्हा कॉलेजच्या आठवणी जागवत नुकतेच एकत्र आले.गुरुवर्य रा. प. सबनीस ज्युनिअर कॉलेज, नारायणगाव (ता.जुन्नर) येथून सन १९९७-९८ च्या इयत्ता १२ वी कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच वसंत व्हीला, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास सुमारे ८० माजी विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्यात मुलींची संख्या लक्षणीय होती.

सदर कार्यक्रमासाठी राजस्थान, चाळीसगाव, मुंबई, पुणे या विविध ठिकाणाहून विद्यार्थी मित्र मैत्रिणींना गुरुजनांना भेटण्यासाठी उपस्थित राहिले होते

स्नेहमेळाव्याच्या आयोजन व यशस्वीतेसाठी प्रशांत पादीर,
पंकज कुलकर्णी, अमर वाजगे, सचिन डेरे, महेंद्र क्षीरसागर, राजेंद्र खामकर, सिमा गाढवे, दिपाली कोकणे, दत्तात्रय घोलप, संदीप वाणी, किरण वाणी, नितीन मुळे, गणेश ढवळे, दत्तात्रय कोळी, अतुल गाढवे, नितीन डेरे, दिपश्री पानमंद, ज्योती औटी, सुजाता वाजगे, बारकू रासकर यांनी प्रयत्न केले. स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच संतोष वाजगे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleसरदार वल्लभभाई पटेल जयंती म्हणजे विभूतीपूजा होय – समाजसेवक डॉ रविंद्र भोळे
Next articleकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ टायर पेटवून राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या;राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल