Home Blog Page 141

सुनिल थोरात यांना राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील अहिल्या माता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनिल आनंदा थोरात (BA.Dted) यांना छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात ‘छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अतिशय बिकट परिस्थिती मध्ये शिक्षण पूर्ण केले वाघोली ते हिंगणगाव हे अंतर सायकल प्रवास करून पूर्ण केले तसेच १० वी ते १२ वी शिक्षण कमवा व शिका या योजने अंतर्गत पूर्ण केले असल्याचे थोरात यांनी सांगितले

जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परषद आयोजित राज्यस्तरीय १३ वे छत्रपती साहित्य संमेलन यामध्ये सुनिल थोरात यांना ‘छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गुलाब वाघमोडे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजयराव तुपे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, दत्तानाना भोंगळे, अमोल बनकर, गौरव कोलते, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, राजाभाऊ जगताप यांचे सह अनेक साहित्यिक लेखक, कवी, व नागरिक उपस्थित होते.

बचत गटातील महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेत उद्योजक बनावे- आदिवासी विकास प्रकल्प सहाय्यक प्रकल्पधिकारी कैलास खेडकर यांचे आव्हान

घोडेगाव

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशवर्धिनी संघाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी सुमारे 700 महिलांची उपस्थिती होती.यावेळी यशवर्धिनी संघाच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या गोहे येथील जय आदिवासी महिला बचत गटाच्या आदिवसी प्रकल्प कार्यालयामार्फत रेनकोट बनविण्याच्या मशीन चे उदघाटन करण्यात आले. बचत गटाला व वैयक्तिकरित्या दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी संघाच्या अध्यक्षा योगिता बोऱ्हाडे, अलका घोडेकर,अलका डोंगरे,ललिता वरपे कल्पना एरंडे,सुहास वाघ, हरिभाऊ गेंगजे, सीमा कानडे उपस्थित होते

यावेळी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक डॉ. पदंमा पोतनीस यांनी योगा विषयावर प्रात्यक्षिक घेतले.गायत्री काळे मॅडम यांनी कोर्ट केसेस संदर्भात मार्गदर्शन केले.

महिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग

महिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग

घोडेगाव

महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब कोथरूड पुणे यांच्या सहकार्याने व आदिम संस्थेच्या स्थानिक संयोजनातून आमोंडी येथील ठाकरवाडीत प्रौढ साक्षरता वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

आमोंडी येथील ठाकरवाडीतील अनेक स्त्रियांना शिक्षण घेता आलेले नाही त्यामुळे त्या निरक्षर असल्याने दैनंदिन व्यवहारांत अनेक वेळा दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.यावर उपाय म्हणुन हा प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.सत्यजित चितळे, त्यांचे सहकारी श्री. उज्वल तावडे, श्री. प्रताप रेगे, श्री.प्रशांत सिद्ध, श्री. मनीष दिडमिशे, श्री. वसंत कुलकर्णी, श्री. सुहर पटवर्धन,आदिम संस्थेचे राजु घोडे, अविनाश गवारी, अर्जुन काळे, सुभाष पारधी आदी यावेळी उपस्थित होते.

उपस्थित महिलांना पाटी,पेन्सिल तसेच साक्षरता वर्गासाठी आवश्यक ते साहित्याचे वाटप करण्यात आले. या साक्षरता वर्गात लेखन, वाचन,अंकगणित याबरोबरच कायदा साक्षरता,आर्थिक साक्षरता, संविधान साक्षरता व आपत्ती व्यवस्थापन साक्षरता याविषयी ही माहिती या वस्तीपातळीवर देण्यात येणार आहे.साक्षरता वर्गाच्या स्वयंसेविका, शारदा केदारी यांचा सत्कार फळा व खडू देऊन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गवारी व आभार प्रदर्शन अर्जुन काळे यांनी केले.

तर कार्यक्रमाचे स्थानिक नियोजन अनिल सुपे, सुभाष पारधी, अजित पारधी, शारदा केदारी, सुवर्णा जाधव यांनी केले.

उरुळी कांचन मध्ये श्रीराम पादुका रथयात्रेचे टाळ, मृदुंग, ढोल ताशाचा नगारा वाजवून स्वागत

उरुळी कांचन

श्री रामचंद्र आणि सीतामाई यांनी श्रीलंकेमध्ये बिभीषन यांना सुपूर्त केलेल्या पादुकांची प्रतिष्ठापना अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये होणार असून १ मार्च २०२२ रोजी श्रीरामांच्या पवित्र पादुका घेऊन श्रीराम वनगमन पथकाव्य यात्रा तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधील २३२ स्थळांना भेटी देऊन १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमीस अयोध्येमध्ये पोहचत आहे.

दरम्यान शुक्रवारी (११) दुपारी उरुळी कांचन मध्ये श्रीराम पादुका रथयात्रेचे आगमन झाले असता टाळ मृदुंग, ढोल ताशा नगारा वाजवीत आणि संपूर्ण पालखी सोहळ्या वरती फुलांचा वर्षाव करत उरुळी कांचन च्या भूमीत रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उरुळी कांचन पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांकडून आणि भजनी मंडळाकडून श्रीरामांचा प्रचंड उत्साहा मध्ये जयघोष करण्यात आला. उरुळी कांचन बस स्टॉप येथे श्रीरामांच्या पादुकांची विधीवत पूजा ज्येष्ठ नेते प्रा. के डी (बापु) कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, भाऊसाहेब तुपे, सागर कांचन, शंकर बडेकर, शरद खेडेकर व शुभम वेदपाठक यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांनी पवित्र पादुकांचे दर्शन घेतले आणि श्रीरामांच्या जयघोषात रथयात्रा दुपारची न्याहारीसाठी लोणी काळभोर ला श्री रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या रामदरा शिवालयात मार्गस्थ झाली.

या सोहळ्याच्या नियोजनात राहुल जाधव, श्रीकांत कांचन, विकास जगताप, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन, अमित कांचन, खुषाल कुंजीर, निखिल कांचन, सचिन काळे, शुभम वलटे, ऋषिकेश शेळके, अक्षय रोडे, हरीश कांचन, अर्चिस वाडेकर, निखिल सोनवणे, ओंकार कांचन, सुनील तुपे, अजित कांचन, बाळा तुपे, निखिल चोरडिया, पूजा सणस, सविता कांचन, सारिका लोणारी, कविता खेडेकर, मुरकुटे ताई, सुचिस्मिता वनारसे आदी पदाधिकाऱ्यां सोबतच उरुळी कांचन पोलीस व ट्राफिक पोलीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संयोजनात मोठा वाटा उचलून सोहळा दिमाखात होण्यास परिश्रम घेतले आहेत.

विठ्ठल विकास सोसायटीवर शिवसेनेचा भगवा ; शिवसेनेचे बाळासाहेब पायगुडे चेअरमनपदी

योगेश राऊत,पाटस

आंबेगाव (ता.दौंड) येथील श्री विठ्ठल विकास विविध कार्यकारी सोसायटी ची बिनविरोध निवडणूक पार पडली या निवडणुकी मध्ये बाळासाहेब पायगुडे, मारुती कडू, मोहन गोडावळे, किसन कडू, तानाजी काळभोर , संतोष कडू देशमुख, शरद धुमाळ, अरुण निढाळकर, शारदा तळेकर, बबई बेनगुडे, प्रविण मोरे, गणेश चव्हाण हे सदस्य बिनविरोध निवडून आले.

आज झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब पायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर निवडणूक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर, बाळासाहेब कडू, सखाराम गोडावळे,सुभाष कडू, महेश पायगुडे, सुरेंद्र हाडके, अशोक राऊत, विजय तळेकर, रविंद्र देशमुख,माऊली निढाळकर, बबन बेनगुडे, बबन तळेकर, संदिप कडू ,दत्तात्रय कडू,निलेश चव्हाण,भाऊ धुमाळ,पंढरिनाथ पासलकर,सोपान कडू,मनोज देशपांडे,अक्षय काळभोर,बंडा कडू,नानासाहेब मोरे,नामदेव कडू,यशवंत कडू,सुभाष काकडे, यांचे नेत्तृत्वाखाली पार पडली

सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला या ठिकाणी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

“जागर आरोग्याचा” कार्यक्रम उत्साहात

नारायणगाव,किरण वाजगे

जागतिक महिला दिनानिमित्त नारायणगाव मध्ये सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था व इंद्रधनू ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “जागर आरोग्याचा”हा कार्यक्रम इंदिरानगर व राजवाडा या भागात घेण्यात आला. यावेळी डॉक्टर स्मिता डोळे’ व डॉक्टर पल्लवी राऊत ‘यांचे महिलांच्या आरोग्या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

महिलांचा आहार,महिलांना होणारे आजार,ब्रेस्ट कॅन्सर, मुलांचे मानसशास्त्र, मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढेल, वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्य विषयक समस्या, आपली प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, कोणता आहार घ्यावा,तसेच आपली व आपल्या कुटुंबाची व परिसराची स्वच्छता कशी राखावी इत्यादी अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना व मुलींना डेटॉल हॅन्ड वॉश व सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर, पुष्पा जाधव, सुरेखा वाजगे, शितल ठूसे,भारती खिवंसरा, निर्मला गायकवाड, ज्योती गांधी, शैलेजा भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शितल ठुसे यांनी केले.

भावकीच्या वादातून ३९ वर्षीय तरूणाची हत्या : सात जणांवर गुन्हा दाखल

नारायणगाव: किरण वाजगे

घर भावकीच्या जुन्या भांडणातून कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथील रोहिदास बाबुराव पाबळे ( वय ३९ ) या तरुणाचा कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी दिलीप रामा आटोळे (रा.जांबुत ,ता.शिरूर), सागर बंडू पाबळे( रा. कावळ पिंपरी ,ता.जुन्नर) , कुणाल संतोष बोरुडे ( वय २१) वर्ष सुफियान निसार आतार (वय २४ वर्ष ,दोन्ही रा. अळकुटी, ता. पारनेर,जि.अहमदनर) त्याचे इतर चार साथीदार यांच्यावर संगनमताने खुन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

या बाबत ताटे म्हणाले मयत रोहिदास पाबळे व सागर पाबळे, दिलीप आटोळे यांच्यात वाद होता. या वरून सागर पाबळे, दिलीप आटोळे यांच्या सांगण्यावरून दत्ता भाकरे व त्याच्या चार साथीदारांनी ९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रोहिदास पाबळे यांच्यावर कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केला. त्या नंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी वनीता रोहिदास पाबळे( वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

पोलीस तपासात सदर आरोपींनी संगनमत करून रोहिदास पाबळे याचा कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना घटनास्थळी काडतूस आढळून आले आहे. या वरून फायरिंग झाल्याचा अंदाज आहे.आरोपींना लवकरच अटक केली जाईल. आशी माहिती स.पो. निरिक्षक ताटे यांनी दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; पुण्यात ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प साकारणार!

उरूळी कांचन

पुणे – अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच मोठी घोषणा केली. वढू- तुळापूर येथे शंभूसृष्टिसाठी 250 कोटी देण्याची व ‘संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. आजच्या स्मृतिदिनी प्रत्यक्ष कृतीतून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचेही स्वागत डॉ.कोल्हे यांनी केले आहे.

आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हें च्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या ‘इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प’ या ड्रीम प्रोजेक्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.

पुण्यात 300 एकर जागेवर ‘इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प साकारणार असल्याची घोषणा आज अजित पवार यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व उपचार पद्धती एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे भरघोस निधी आणण्यात यशस्वी झाले असून मतदारसंघासाठी विकासकामांचा ओघ त्यांनी कायम ठेवला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या आजरांचे अद्यावत उपचार एकाच छताखाली देण्यासाठी महाराष्ट्रासाठी पहिली ‘इंद्रायणी मेडिसीटी’ उभारण्यात येणार असून यामध्ये विविध प्रकारच्या आजरांसाठी २४ विभागांच्या स्वतंत्र इमारती निर्माण केल्या जाणार असून या मेडिसिटीमध्ये १० ते १५००० रुग्णांवरती उपचार करण्याची क्षमता असणार आहे. इंद्रायणी मेडिसिटी हा भव्यदिव्य प्रकल्प ३०० एकरात साकारणार आहे.

अष्टविनायक मंदीर विकासासाठी मा. अजितदादा यांनी 50 कोटींचा निधी मंजूर केला. अष्टविनायकांपैकी ४ गणपती शिरूर मतदारसंघातील ओझर, लेण्याद्री, रांजणगाव व थेऊर येथे असल्याने डॉ. कोल्हेंनी अजित पवार यांचे आभार मानले! तसेच फुले वाड्यासाठी १०० कोटींचा निधी व आळंदी- केंदूर- पाबळ-वाफगाव-पेठ रस्ता रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ८ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दलही डॉ. कोल्हे यांनी सरकारचे आभार मानले!

अपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्यामुळे श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे पारडे जड

नारायणगाव ( विशेष प्रतिनिधी)

नारायणगाव विकास सोसायटी च्या निवडणुकीमध्ये शेवटचे काही दिवस शिल्लक असताना आता खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत आली आहे. याला कारणही तसेच आहे दोन्हीही पॅनल कडून आरोप-प्रत्यारोप होत असताना मतदार राजा नेमके आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार हे येत्या १३ तारखेला स्पष्ट होणार आहे. असे असले तरी मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास आघाडीच्या वतीने विजयाचा दावा केला जात आहे. याला कारणही तसेच आहे शेतकरी विकास आघाडी च्या इतर मागासवर्गीय गटातून अरुण आबा कोल्हे हे बिनविरोध निवडून गेले आहे तर महिलांच्या दोन राखीव जागांसाठी शेतकरी परिवर्तन पॅनल च्या वतीने केवळ एकच महिला उमेदवार दिल्याने येथेही एक महिला उमेदवार शेतकरी विकास पॅनलची निवडून आल्यात जमा आहे. त्यातच भर म्हणून की काय अपक्ष उमेदवार गणेश जनार्दन वाव्हळ यांनी शेतकरी विकास पॅनलला जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

यामुळे शेतकरी विकास पॅनल निर्णायक आघाडी घेईल हे सांगण्यास कोणता भविष्यवेत्ता आणण्याची गरज नाही.
दरम्यान श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या वतीने गुरुवार दि.१० रोजी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. या पॅनलच्या विरोधी निवडणूक लढवणा-या शेतकरी परिवर्तन पॅनलच्या आरोपांना सरपंच योगेश पाटे व पॅनल प्रमुख संतोष नाना खैरे यांनी जशास तसे व परखड उत्तर दिले आहे.वारूळवाडी व नारायणगाव च्या सरपंचांनी सोसायटीची ही निवडणूक लादली असून जर त्यांनी मनात आणले असते तर ते ही निवडणूक बिनविरोध करू शकले असते.

मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यास दोन्ही सरपंच अपयशी ठरले या आरोपावर सुमारे पाच दिवसानंतर सरपंच योगेश पाटे यांनी गणेश वाजगे, भागुजी पानसरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच पाटे यांनी गणेश वाजगे यांना तीन अपत्य असताना आम्ही अर्ज छाननी मध्ये त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही. तसेच संस्थेचे माजी चेअरमन भागुजी पानसरे यांनी रेशन घोटाळा केल्यामुळे ते अडचणीत सापडले होते. असा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे भटक्या जाती जमातीचे उमेदवार येल्लू लोखंडे हे शासनाचे लाभार्थी (रेशन दुकानधारक) आहेत. त्यांच्यावर अर्ज छाननी मध्ये आक्षेप घेतला असता तर ते देखील निवडणुकीला अपात्र ठरले असते. असाही आरोप सरपंच पाटे यांनी केला आहे. या विषयावर सरपंच योगेश पाटे व पॅनल प्रमुख संतोष नाना खैरे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की वारूळवाडी गावातून समोरच्या पॅनल ला सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार देखील उभा करता आला नाही. त्यामुळे येथील मतदार शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने राहणार आहेत. या निवडणुकीत पारंपरिकरीत्या गावातील सर्व जथ्यांना उमेदवारी देण्यात विरोधी पॅनल अपयशी ठरले आहे. शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित कसा आहे, याबाबत त्यांना विचारले असता पाटे म्हणाले की, त्यांचे काही उमेदवार आता एक तरी मत मला द्या बाकीची मत त्यांना द्या असा प्रचार करू लागले आहेत. यामुळे आमच्याच कपबशीमध्ये आम्ही विरोधकांना चहा पाजणार असा दावा सरपंच योगेश पाटे यांनी केला आहे.

अष्टापुर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वाढदिवसाचा अनोखा उपक्रम

उरुळी कांचन

अष्टापुर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाचा अनोखा उपक्रम विज्ञान दिनापासून विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे वाढदिवस मुलांना चॉकलेट न देता विद्यालयातील गरीब होतकरु हुशार विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन पेन्सिल कंपास इत्यादी साहित्य वस्तू स्वरुपात भेट दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आपुलकी मदत करण्याची वृत्ती निर्माण होते तसेच काही विद्यार्थी आपल्या वाढदिवसादिवशी विद्यालयातील ग्रंथालयासाठी पुस्तक भेट देतात. तेच पुस्तक त्याच वर्गातील विद्यार्थ्यास वाचन करण्यासाठी दिले जाते.

पुस्तकाचे वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. विद्यालयातील उपशिक्षक श्री चौधरी सर यांनी सुचित केले की, ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्या विद्यार्थ्याला एक वृक्ष रोप भेट देण्यात येईल. ते वृक्ष रोप अष्टापुरचे मा.सरपंच आणि प्रासादिक दिंडी चे मा.अध्यक्ष कै. अण्णासाहेब सोपाना कोतवाल यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विकास आण्णासाहेब कोतवाल यांनी देण्याचे कबूल केले आहे. त्याप्रमाणे त्यांनी विद्यालयातील विद्यार्थीसाठी वृक्ष रोप भेट देत आहेत .

काल विद्यालय मध्ये इयत्ता ७ वी अ मधील विद्यार्थिनी कु. मानसी प्रदीप जगताप हिने वाढदिवसा निमित्त विद्यालयातील ग्रंथालयासाठी “छत्रपती शिवराय” हे पुस्तक भेट दिले आहे. तेच पुस्तक त्याच वर्गातील विद्यार्थिनी कु.गायत्री मेमाने हिने वाचन करण्यासाठी घेतलेले आहे. तसेच इयत्ता ७ वी अ मधील विद्यार्थिनी कु वैष्णवी चंद्रकांत कोतवाल हिने गरीब विद्यार्थ्यांसाठी एक डझन वह्या भेट दिलेले आहेत. त्या वह्यांचे वाटप इयत्ता ५ वी ,६ वी, ७ वी मधील गरीब विद्यार्थ्यांना देण्यात आले. कु मानसी जगताप आणि कु वैष्णवी कोतवाल यांना विद्यालयाच्या पर्यवेक्षिका दळवी मॅडम आणि सातपुते मॅडम यांच्या हस्ते एक वृक्ष रोप भेट देण्यात आले. त्या वृक्षाचे संगोपन आणि जोपासना करावे असे त्यांना सांगण्यात आले अशाप्रकारे विद्यालयांमध्ये वाढदिवसाचा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे.