भोरगिरी येथे चक्रिवादळाने नुकसान झालेल्या कुटूंबांना हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनकडून मदत

राजगुरूनगर- खेड तालुक्यात चक्रीवादळाचा सर्वांधिक फटका भोरगिरीला बसला,अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, या वादळात उद्धवस्त झालेल्या कुटूंबांना हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने ५० सिमेंटचे पत्रे देण्यात आले.

यावेळी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन अध्यक्षा अँड. मनिषाताई पवळे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन संचालक संतोषभाऊ सांडभोर,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विठ्ठल वनघरे,सचिव सचिनशेठ वाळुंज,मा.अध्यक्ष सुनिलशेठ वाळुंज,मा.कार्याध्यक्ष दिलीपशेठ होले, संचालिका नाझनीन भाभी शेख, कार्याध्यक्ष राहुल मलघे,भोमाळे गावचे सरपंच सुधीर भोमाळे,मा.सरपंच अर्चना वनघरे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता वनघरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleमोशी ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार – खा. डॉ. अमोल कोल्हे