राष्ट्रवादीचे कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सीजन निर्मितीचे आदेश

अमोल भोसले,पुणे

राज्यात दिवसेंदिवस वेगाने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा आणि पोलिस शासन तसेच कोरोना महामारी संबंधित इतर सर्व यंत्रणा आणि संबंधित लोक यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण आला आहे. कोरोना लसीकरणावर भर दिला जात असला तरी लसीचा तुटवडा रेमेडीसीवर इंजेक्शन आणि बेडच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

यातच राज्यात गेल्या – २४ तासात – ६७ – हजार – १३ जनांची चाचणी सक्रिय आली असून – ६२ -हजार – २९७ – जण या साथीत मुक्त होऊन घरी परतले आहेत तर काल दिवसभरात राज्यातील – ५६८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमावल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. ऑक्सिजनच्या निर्माण झालेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सरसावले असून त्यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यातील तब्बल -१९० – साखर कारखान्यांना ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे आदेश वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने साखर कारखान्यांना पत्र पाठवून दिले आहेत. जे कारखाने बंद आहेत त्यांना ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयाना पुरवावे असेही आव्हान पवार यांनी पत्रात केले आहे.

Previous articleजागतिक पुस्तक दिनानिमित्त समयसूचक वक्ते, शिक्षकनेते धर्मराज पवळे यांचे स्वगत
Next articleपत्रकार म्हणून आपण व्यक्त  होणार आहोत की नाही – बापुसाहेब गोरे