अमोल भोसले,उरुळी कांचन
उरुळी कांचन व परिसतील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये. कोरोना रोगाची साखळी तोडायची असेल तर घरात बसूनच प्रशासनाला सहकार्य करावे. ग्रामपंचायतचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व उरुळी कांचन पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी केले.
मास्कचा वापर न करणार्या ३७ दुकानदारांकडुन मागील तीन दिवसात ९३७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस व उरुळी कांचन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई चालू आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरूद्ध एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
पोलिस हवालदार अमोल भोसले, शिवाजी बनकर, कर्डिले, होले व ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत गायकवाड आदी कारवाई करत आहेत.