अवघ्या आठ दिवसातच नववधू दागिने घेऊन पसार

प्रमोद दांगट , निरगुडसर

लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच मावशी आजारी आहे असे सांगून घरातील पाच तोळे दागिने अंगावर खालून नववधू पसार झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे घडली आहे. याबाबत नितीन कांताराम कुरकुटे ( वय वर्ष ३२ रा.भराडी ता.आंबेगाव ) याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी नितीन कुरकुटे हे लग्नासाठी मुलगी शोधत असताना त्यांच्या ओळखीतील मध्यस्थी नवनाथ महादेव गवारी ( रा.गवारीमळा ता.आंबेगाव पुणे )याने कुरकुटे यांना शिंगणापूर परभणी येथील लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण या मुलीचे स्थळ सुचवले त्यानंतर कुरकुटे यांनी दि.१४ रोजी गवारी यांना मध्यस्थीचे दीड लाख रुपये दिले त्यानंतर मुलीची मावशी , मामा , काळे नावाचा इसम यांनी घाई गडबड करून आम्ही गरीब आहे असे सांगून नवऱ्या मुलाचा विश्वास संपादन करत दि १५/२/२१ रोजी भराडी (ता.आंबेगा)व येथे फिर्यादीच्या राहत्या घरी विवाह केला त्यानंतर आठ दिवसातच नवरी मुलीने माझी मावशी आजारी आहे असे सांगून अंगावर पाच तोळे दागिने घालून गेली आठ ते दहा दिवस होऊनही ती आली नसल्याने तिची चौकशी केली असता नवरी मुलगी व तिच्याबरोबर असलेले मामा ,मावशी हे शिंगणापूर येथील पत्त्यावर राहत नसून ती खोली त्याने एक दिवसासाठी भाड्याने घेतली असल्याचे समजले.त्यानंतर फिर्यादी कुरकुटे यांनी लग्न जमविणारे मध्यस्थी गवारी यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन कुरकुटे यांनी नवनाथ महादेव गवारी ( रा. गवारीमळा मेंगडेवाडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण ( मुलगी ) ,कमल नामदेव जाधव ( मावशी ) , महादेव लक्ष्‍मण चिंचवड ( मामा ) व काळे नावाचा इसम सर्व रा.शिंगणापूर तालुका जिल्हा परभणी ) याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleकोरोनाच्या पार्श्वभूमिवर होळी, धुलीवंदन सण / उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई
Next articleधामणी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई