भीमाशंकर कारखान्याच्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्याचे पुजन

प्रमोद दांगट

दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ मधील उत्पादीत केलेल्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्याचे पुजन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, दगडू मारुती शिंदे,शांताराम हिंगे, आण्णासाहेब पडवळ,भगवान बो-हाडे,तानाजी जंबुकर,अक्षय काळे, ज्ञानेश्वर अस्वारे, तज्ञ संचालक किसनराव उंडे, यशवंत वाहतूक संस्थेचे अध्यक्ष गणपतराव इंदोरे, माजी संचालक पांडूरंग सैद, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे तसेच अधिकारी व कर्मचारी हजर होते.

गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरामधील आजअखेर १३५ दिवसात ७ लाख ३६ हजार ३१० मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी १०.९७ टक्के साखर उता-याने ८ लाख १ हजार १११ पोती साखर उत्पादन केले आहे. कारखाना सहविज निर्मिती प्रकल्पाद्वारे आजअखेर १३८ दिवसात ५ कोटी ३४ लाख ८ हजार २४० युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता ३ कोटी १५ लाख २ हजार ८८० युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. कारखान्याचा २१ वा गळीत हंगाम चालू असून कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ऊस उत्पादक शेतक-यांना उच्चतम ऊस दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बेंडे यांनी दिली.

Previous articleकाठापुर येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; अकरा जणांवर गुन्हा दाखल
Next articleकेंद्र सरकारने साखर कारखान्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज – वळसे पाटील