शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना चाळीसगाव येथून पोलिसांनी केली अटक

प्रमोद दांगट , निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील तिन शेतकऱ्यांना ऊस तोडणी मजूर पुरवितो असे सांगून शेतकऱ्यांकडून ७१,१२,९०० रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन ऊस तोडणी करणाऱ्या मुकादमांना मंचर पोलिसांनी चाळीसगाव येथे जाऊन अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शेतकरी नवनाथ कोंडीभाऊ शिंदे ( रा.साकोरे ता.आंबेगाव जि पुणे ) यांनी व इतर ७ ते ८ शेतकरी यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊस गाळप हंगाम करीता ऊसतोड कामगार मिळावे यासाठी वेगवेगळे तीन ऊसतोड मुकादम यांना एकूण ७१,१२,९०० रुपये दिले होते.मात्र पैसे देऊनही करारा प्रमाणे या मुकादम यांनी कोयते व ऊसतोड कामगार पुरविले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली आर्थिक फसवणूक झाल्याने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली सदर मुकादम यांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या आदेशाने पो. उपनिरीक्षक सागर खबाले, पो. ना. खैरे, पो. ना. मडके, पो. कॉ. वाघ पोलिस कॉन्स्टेबल रोडे यांच्या पथकाने चाळीसगाव जि जळगाव येथे जाऊन मुकादम १)श्रावण जगन राठोड २)नितीन पंडित पाटील ३)अनिल पंडित जाधव ( सर्व रा. चाळीसगाव जि.जळगाव ) यांना अटक केली आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार (दि १०) पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. या आरोपींनी परिसरातील अजून कुठल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल तर त्यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी असे आवाहन मंचर पोलीस स्टेशन चे पो.नि. कोरे यांनी केले आहे.

Previous articleउसने पैसे दिले नाही म्हणून मावस बहिणीने बहिणीला फेकून मारली इस्त्री
Next articleआंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात तलाठी आपल्या सजामध्ये न थांबल्यास आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा