Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिताराम काळे घोडेगाव-
ध चा म झाला तसं वाडीचे नगर केले आणि आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी या महसुली गावात मागील 28 वर्षांपासून शासना च्या निधीमधून वगळून सदर गावचा निधी दुसऱ्या गावाला दिल्याचा प्रकार घडला हे प्रशासनाच्या गलथानपणामुळे वाळुंज वाडी हे गाव शासनाच्या आर्थिक निधी व गावात असणारे साडेतीनशे इतर मागासवर्गीय समाजातील नागरिक लाभांपासून वंचित राहिले असल्याची माहिती वाळुंज वाडी ग्रामस्थांनी मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंचर येथे वाळुंज वाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रुक्मिणी पुनाजी खंडागळे (सरपंच), सोनाली सुनील वाळुंज (माजी उपसरपंच), पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, बाळासाहेब एकनाथ लोंढे, नवनाथ चिंतामण वाळुंज, भिमराव बाजीराव वाळुंज, जीवन बाजीराव निघोट, मनोहर जनाजी लोंढे, सागर कोंडीभाऊ वाळुंज, कांतीलाल ज्ञानेश्वर वाळुंज, प्रकाश ज्ञानेश्वर वाळुंज, आदी उपस्थित होते.
मागील 28 वर्षापासून आंबेगाव तालुक्यातील वाळुंज वाडी हे महसुली गाव शासनाच्या निधीमधून वगळून सदरचा निधी दुसऱ्याच गावाला दिला जात आहे शासनाच्या या गलथान पणामुळे आजपर्यंत हे गाव शासनाच्या वेगवेगळ्या आर्थिक निधी आणि लावण पासून वंचित राहिले आहे वाळुंज वाडी आणि वडगाव काशिंबेग या दोन गावांसाठी एक ग्रामपंचायत होती वडगाव काशिंबेग गावची लोकसंख्या सत्तावीसशे सतरा व वाळुंज वाडी गावची लोकसंख्या 1026 अशी एकूण लोकसंख्या तीन हजार 643 होती त्यानुसार सदर ग्रामपंचायत वडगाव काशिंबे कडे दोन्ही गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी शासनाकडून उपलब्ध होणे गरजेचे होते परंतु आज अखेर केवळ वडगाव काशिंबेग गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी आल्याने सदर तुटपुंज्या निधीमुळे गावचा विकास अनेक वर्ष रखडला असले ची माहिती नवनाथ वाळुंज यांनी दिली.
वाळुंज वाडी गावास वडगाव काशिंबेग पासून तोडून स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाली त्यानंतर तेथील तरुणांच्या व ग्रामस्थांच्या ही गोष्ट निदर्शनास आली गेली अठ्ठावीस वर्षे वाडी गावाचा सेन्सेक्स व लोकसंख्या यांचा वापर करून एक महसुली असलेल्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आणि गेली 28 वर्षे आनंदवाडी गावात लोकसंख्येच्या तुलनेत मिळणारा सर्व निधी एका गावच्या विकासासाठी स्वतंत्र स्थापन केलेल्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत नवनाथ वाळुंज यांनी गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे मात्र गावचे झालेले नुकसान भरून निघू शकत नाही, गावात झालेला अन्याय हा ज्यांच्यामुळे झाला आहे, शिवाय वाळुंज वाडी गावात साडेतीनशे ठाकर समाजाचे नागरिक असताना मागील 28 वर्षात त्यांना कोणताही लाभ नाही मिळाला तो लाभ सदर दुसऱ्या गावाला गेला आहे, ज्या गावाला मिळाला त्या गावातील नागरिक यांचे मतदान सुद्धा वाळुंज वाडी गावात दाखवले जात आहे व त्या गावचे मतदार हे दुसऱ्या गावातील दाखवले आहे, हा प्रशासनाने केलेला मोठा नागरीकांचा फसवणुकीचा प्रकार आहे,त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केली आहे.
वडगाव काशिंबेग पासून तोडून तयार झालेली वाळुंज वाडी ग्रामपंचायतीचा गेले 28 वर्ष मिळालेला निधी ज्या गावाला मिळाला त्या गावाला सेन्सेक्स नंबर नसतानाही दिला गेला याबाबत गटविकास अधिकारी व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करणार असून शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व उत्पादनशुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कानावर हा विषय घालून त्याची पूर्तता करणार असल्याची माहिती प्रा. राजाराम बाणखेले यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.