शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवाडीत ३०७ जणांचे रक्तदान

अमोल भोसले उरुळी कांचन

बेलवाडी येथे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरामध्ये ३०७ जणांनी रक्तदान केले.

यावेळी भरणे म्हणाले की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचां हा स्तुत्य उपक्रम आहे असे युवक संघटन तालुक्यात चांगले काम करत आहे. रक्तदान ही एक चळवळ आहे. रक्त हे कोणत्या कंपनी मध्ये तयार होत नाही ते अशा शिबिरांमधून संकलित केले जाते त्यामुळे नागरिकांनी वर्षातून दोनदा रक्तदान केले पाहिजे असे आवाहन भरणे यांनी केले.
शिबिराचे आयोजन इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड‌.शुभम निंबाळकर यांनी केले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण भैय्या माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील,नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, कांतीलाल जामदार,सर्जेराव जामदार, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, ॲड.सचिन वाघ,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ,
ॲड अमरसिंह मारकड, योगेश पाटील, अजय सपकाळ , सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नानासाहेब पवार, यशवंत जामदार, हनुमंत खैरे, महिपती यादव,केशव नगरे, सचिन पवार, ओंकार जामदार, दादा यादव,जावेद मुलाणी,सुमित जगताप, कल्याण जामदार, मयुर जामदार,धीरज निंबाळकर,अभि यादव, आदिजण उपस्थित होते. यावेळी सभापती प्रवीण माने म्हणाले की रक्तदान करणे ही काळाची गरज आहे ती ओळखून नागरिकांनी युवकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले पाहिजे. आपले एक रक्तदान कोणाचे तरी प्राण वाचवू शकते त्यामुळे रक्तदान हे पुण्याचे काम आहे.

बेलवाडी मारुती मंदिरासाठी १५ लाख व जोतिबा मंदिरासाठी १० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन यावेळी भरणे यांनी दिले.

Previous articleचास येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या,नव-यासह चौघांवर गुन्हा दाखल
Next articleरोड रोलरला मोटारसायकलची जोरदार धडक : वाडा येथील दुचाकीस्वार जागीच ठार