अहिरे गावातील नागरिकांना एन डी ए प्रशासनाने वेळेची मर्यादित शिथिलता देण्याबाबत शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना व तहसीलदारांना निवेदन


अतुल पवळे पुणे
कोरोनाच्या पाश्वभूमीवर सगळीकडे लाॅकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून एन डी ए प्रशासनाने अहिरे गाव व जवळपासच्या सगळ्या वाड्यांना व नागरिकांना त्यांच्या हद्दीतून जा ये करण्यास काही कडक नियम घातले आहे. आता संपूर्ण देशात नियमांमध्ये शिथिलता करण्यात आल्या आहेत, तरी प्रशासन मात्र जुन्याच नियमानुसार चालत आहे. वेळेची बंधन देखील पूर्वीचीच लावत आहे. या भागातील लोक शेतकरी असल्याने त्यांना बि बियाणे व शेतीसंबंघी काही खरेदी करायची असल्यास सकाळी यावं लागत आहे, परंतु परत जाण्यासाठी मात्र संध्याकाळपर्यंत थांबावे लागत आहे. या सगळ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, यासाठी शिवसेनेच्या वतीने नितीन वाघ माजी पंचायत समिती सदस्य यांनी पुणे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले, यामध्ये वेळेच बंधन वाढविण्यासाठी मागणी केली व नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत विनंती केली आहे.

Previous articleएक तासाच्या आत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतली मनसेच्या तक्रारीची दखल
Next articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या सूचना