आंबेगाव तालुक्यालाही चक्री वादळाचा तडाखा ; तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

 

निरगुडसर : प्रतिनिधी

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर , मुंबई, ठाणे, पालघर ,पुणे ,परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.या निसर्ग चक्री वादळाचा तडाखा आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागापासून ते खाली चाळीस गावापर्यत सर्वच गावांना बसला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्र अगोदरच कोरोना सारख्या महामारीने हैराण झालेला असताना या चक्री वादळामुळे निर्माण झालेल्या जोरदार हवा व पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.आंबेगाव तालुक्यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील धान्य, कपडे व अंथरुण पांघरूण आलेल्या पावसाने भिजली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी साठवून ठेवलेली वैरणही भिजली आहेत तर अनेक ठिकाणी बाजरी,फ्लॉवर,टोमॅटो,अशी पिके पूर्ण खाली पडली असून शेती पिकांमध्ये पाणी साचले आहे तर अनेकांच्या पोल्ट्री चे पत्रे, शेडचे पत्रे उडून गेले आहेत यासह तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली असून रस्ते बंद झाले आहेत शाळा ,समाज मंदिरे यांचे पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी वीज महावितरण कंपनीचे खांब कोसळले असून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

निसर्ग चक्री वादळाचा तडाखा तालुक्यातील सर्वच गावात बसला असून या वादळात अनेकांच्या शेती पिकाची ,घराचे, पोल्ट्री शेडचे, जनावरांच्या खाद्याचे नुकसान झाले आहे तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणी पहाणी करुन शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंब व शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous articleडॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून खेड घाट बायपास रस्त्याची पाहणी
Next articleआंबेगाव तालुक्यातील १४ गावे झाली कोरोनामुक्त