दुर्देवी – चासकमान धरणात चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील चासकमान धरणात चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत दोन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

प्ररिक्षित आगरवाल,रितीन डीडी, कु.नव्या भोसले,कु.तनिष्का देसाई अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या परीसरातील दरकवाडी हद्दीत कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूल मधील चार मुले चासकमान धरणात बुडाल्याची घटना संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दोन मुली आणि दोन मुले मृत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.”

Previous articleदौंड शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक बोरमलनाथ मंदिरात संपन्न
Next articleहवेली तालुका कृषी विभागाच्यावतीने महिलांसाठी मूल्य वर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण