स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त साने गुरुजी कथामालेच्या वतीने कथाकथन

राजगुरूनगर- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने साने गुरुजी कथामाला समिती पुणे यांच्या वतीने कथाकथन उपक्रमांतर्गत ७५ शाळांमध्ये कथाकथन उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील कनेरसर केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा गोसासी, वरूडे, जालिंदरनगर, कनेरसर येथे कथाकथन आयोजित करण्यात आले होते.
कथामालेचे कथाकार श्रीमती अपर्णा निरगुडे मॅडम व शोभना जोगळेकर मॅडम यांनी साने गुरूजी,स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम,लता मंगेशकर यांच्या कथा अतिशय मार्मिकपणे ओघवत्या शैलीत सादर केल्या.

तसेच देशभक्तीपर गीते,स्फूर्तीगीते,गायन केली.या कथा व गाणी ऐकुन विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला.याचे सर्व श्रेय जाते ते अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे मुख्य कार्यवाह आदरणीय श्री.शामराव कराळे सर यांनी हा योग घडवून आणला.

या वेळी कनेरसर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.चंद्रकांत दौंडकर (भाऊ)यांच्या हस्ते श्रीमती अपर्णा निरगुडे मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्री.चंद्रकांत दौंडकर यांनी साने गुरुजी यांच्या जीवन कार्यावर आधारीत २१ पुस्तके कनेरसर व जालिंदरनगर शाळेस भेट म्हणून दिली.विद्यार्थ्यांनी त्यांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयोग करावा व सानेगुरुजी यांचे विचार आत्मसात करावे असे सांगितले.

या कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे मॅडम, शुभांगी जाधव मॅडम, साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीणचे कार्यकारीणी सदस्य श्री.संदिप म्हसुडगे सर,कनेरसर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.चंद्रकांत दौंडकर उपस्थित होते.
या वेळी कनेरसर शाळेतील शिक्षिका श्रीम.सारिका राक्षे मॅडम यांनी सर्वाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleकंत्राटी वीज कामगारांचा २१ मार्चला विधानसभेवर मोर्चा
Next articleप्रतिकूल परिस्थितीवर मात करत सागर ताले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड