उरुळी कांचन विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजाराम कांचन तर उपाध्यक्षपदी संभाजी कांचन यांची निवड

अमोल भोसले

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील ग्रामविकास सेवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकांमध्ये जेष्ठ नेते प्रा.के.डी. कांचन यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेल बिनविरोध निवडून आले. आज झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार – विश्वस्त राजाराम कांचन यांची चेअरमनपदी व महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.

चेअरमनपदी निवड झाल्यानंतर राजाराम कांचन यांनी येणाऱ्या काळात संस्थेचा कारभार हा के.डी. कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या हिताचाव पारदर्शक करणार असल्याचे सांगितले. जेष्ठ नेते प्रा.के.डी.कांचन यांनी आपल्या भाषणात संस्था स्थापनेचे उदिष्ट, संस्था उभारताना सभासदांनी घेतलेले कष्ट या विषयी माहिती सांगितली व येणाऱ्या काळात संस्थने कोणती लोकउपोयोगी कामे केली पाहीजेत ह्याचे मार्गदर्शन केले. उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी शुभेच्छा दिल्या. महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर यांनी अभिनंदन केले. भाजपचे सहकोशाध्यक्ष श्रीकांत कांचन यांनी आभार व्यक्त केले.

या प्रसंगी प्रशासक विजयसिंह माळवदकर, निवडणुक अधिकारी वराळ, संस्थेचे सचिव ज्ञानदेव माऊली कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, श्रीकांत कांचन भाऊसाहेब कांचन, सस्थेचे संचालक नंदकिशोर बगाडे, संभाजी कांचन, एकनाथ चौधरी, सुखराम कांचन, हरिभाऊ कांचन, संतोष टिळेकर, निलेश भन्साळी, वत्सला साठे, मनिषा बाप्ते, प्रेमाची थोरात हे उपस्थित होते.

Previous articleमुलाच्या वाढदिवसासाठी चाललेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू
Next articleतमाशा फडमालक व तमासगीरांच्या भावना तीव्र