एस. एम. देशमुख यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला न्याय मिळवून द्यावा

 

उरुळी कांचन – प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त जेष्ठ पत्रकार – पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक, मुंबई गोवा महामार्गाच्या यशस्वी लढ्याचे अग्रणी सामाजिक कार्यकर्ते एस एम देशमुख यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला न्याय मिळवून द्यावा, खरे तर या जागा समाजातील विविध क्षेत्रात जाणीवपूर्वक महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यातून मिळालेल्या अनुभवाचा फायदा कायदे मंडळाच्या उच्च सभागृहाला मिळावा व त्यातून समाजाच्या उत्थानाच्या कार्याला वेग यावा , उपेक्षित वर्गाचा विकास व्हावा ही भूमिका तत्कालीन समाज धुरिणांनी घेतली व पाळली.
मात्र काही वर्षांपासून पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात या जागांना राजकीय स्वरूप आले आहे, ते कोणी तरी थांबवणे गरजेचे आहे आणि यासाठी आमच्या दृष्टीने आपण धाडसाने हे काम कराल ही भावना जागृत झाल्याने आपणास नम्र विनंती करतो की बऱ्याच दिवसांपासून राज्यातील तमाम पत्रकार वर्गाचे अनेक प्रश्न, मागण्या प्रलंबित आहेत त्या सभागृहात अभ्यासूवृत्तीने व कळकळीने मांडण्यासाठी व त्यातून पत्रकार बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी एस.एम. देशमुख यांच्यासारख्या लढवय्या नेत्याला ही संधी मिळावी अशी मागणी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे वतीने अध्यक्ष सुनिल लोणकर व जिल्हा समन्वयक पुणे जिल्हा पत्रकार संघ – तथा अध्यक्ष हवेली तालुका पत्रकार संघ सुनिल जगताप यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,, उपमुख्यमंत्री अजित पवार,, कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष व मंत्री जयंत पाटील , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे ईमेल व्दारे निवेदन पाठवून केली आहे.

Previous articleशॉटसर्किट होऊन घराला लागलेल्या आगीत सर्व जळून खाक
Next articleसर्वसामान्य जनतेची हक्काची लाल परी निघाली ; रोटरी क्लब च्या वतीने वाहक व चालक यांचा सन्मान