१९७५ साली एसएससी मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन

नारायणगाव : (किरण वाजगे)

नारायणगाव येथील गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिरातील १९७५ साली एसएससी मध्ये शिक्षण घेतलेल्या सुमारे ११५ विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा येत्या रविवारी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी विद्यामंदिराच्या वसंतव्हिला सभागृहात होणार आहे.
याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या स्नेहमेळाव्या विषयी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राजश्री बोरकर तसेच खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मातोश्री रंजना कोल्हे, सतिश लालू दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना या स्नेहमेळाव्याविषयी माहिती दिली.


याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक सुरेश गोसावी सर, मुख्याध्यापक वाघोले सर, तसेच तत्कालीन शिक्षक सुखदेव भोर सर, सुरेश आंबेडकर सर, हेमलता सोहनी तसेच इतर शिक्षक माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला रंजना कोल्हे, राजश्री बोरकर, संध्या वायकर, संध्या भुजबळ, दिलीप निंबाळकर, सदानंद भोसले, सिताराम खेबडे, नंदकुमार श्रीवत, सतिश लालू दळवी आदी उपस्थित होते.

Previous articleदेशातील सर्वात मोठा राजकिय पक्ष म्हणून भाजपची वेगळी ओळख – संदीप भोंडवे
Next articleआदिनाथ थोरात यांचा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गौरव पत्र देऊन सन्मान