शिवजन्मभूमी शिवनेरीची माती अयोध्येत नेल्यानेच राम मंदिराच्या कार्याला वेग आला – खा.संजय राऊत

नारायणगाव (किरण वाजगे)

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी वरील माती शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या येथे नेल्यानंतरच राम मंदिराच्या कार्याला वेग आला असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अपेक्षेप्रमाणे खा. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी सह काँग्रेसला देखील कोपरखळी मारली आहे. राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचे सरकार असते. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर आहे. ही आपली पॉवर आहे, असं म्हणत खा.राऊत यांनी सेनेची पॉवर दाखविली. दुसरीकडे शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपलेच आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते, असं म्हणत शिवसेनेचं महत्त्व अधोरेकित केलं. तसेच जुन्नर तालुक्यातचे देशात व राज्यात असणारे महत्व खा.राऊत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाव न घेता म्हटले की, शिवसेना सोडून गेलेली बोचकी पुन्हा पक्षात घ्यायची नाहीत.दरम्यान मेळावा सुरू होण्यापूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे आळेफाटा येथे शिवसैनिकांनी उत्साहात स्वागत केले.

या प्रसंगी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, संपर्क प्रमुख दिपमाला बढे, नगराध्यक्ष शाम पांडे, माजी जिल्हा उपप्रमुख संभाजी तांबे, नेताजी डोके, शरद चौधरी, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे, बाजार समिती उपसभापती दिलिप डुंबरे, उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, दिलिप बामणे, प्रसन्ना डोके, बाळासाहेब पाटे, योगेश पाटे,चंद्रकांत डोके, आनंद रासकर, मंगेश काकडे, तसेच अनेक शिवसैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत.

या मेळाव्यात भाजपचे नेते सुनिल मेहेर, भाजपच्या महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष स्वाती ढोले, दत्तोबा ढोले, मनसे चे तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे, तसेच इतर भाजप, राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत व उपनेते मिर्लेकर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यती च संदर्भात आपण न्यायालयात लढलेल्या दाब या विषयी उलगडा करताना कर्नाटक कर्नाटक राज्यात कशापद्धतीने बैलगाडा शर्यती सुरू झालेल्या या विषयी माहिती दिली आमदार माजी आमदार शरद सोनवणे यांनी दाऱ्या घाट आपल्या सुरू करण्याची मागणी करत बिबट्या सफारी प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी खासदार राऊत यांनी मदत करावी असे आवाहन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांनी मानले.

राहुल गांधींनी माझ्याकडुन शिवसेनेची रचना समजून घेतली

महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेची संघटना व पक्ष बांधणी ही दिवसेंदिवस वाढतच असून शिवसेनेला मिळणारे यश निर्भेळ असेच आहे.

याविषयी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मला वेळोवेळी विचारणा केली. तेव्हा आपण त्यांना शिवसेनेची रचना विस्तृतपणे सांगितली असल्याची माहिती यावेळी बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली*

Previous articleचंद्रकांत वारघडे यांचे वृक्षरोपणाचे काम कौतुकास्पद – वनपरीक्षेत्र अधिकारी दिपक खलाने
Next articleमहा आवास ग्रामीण पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वितरण