काळेवाडी साठवण तलावात पाणी सोडण्याची मागणी

दिनेश पवार,दौंड

काळेवाडी येथील साठवण तलावात बी.बी.सी.कॅनॉल द्वारे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी व ग्रामस्थांनी पत्राद्वारे उपअभियंता खडकवासला पाटबंधारे विभागाकडे केली आहे,काळेवाडी येथील साठवण तलावात परिसरातील सुमारे 40 हेक्टर च्या वर क्षेत्र अवलंबून आहे, तसेच हिंगणीबेर्डी व काळेवाडी येथील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे.

तलावात पाणी नसल्याने दोन्ही गावांची पाण्याची गैरसोय होत आहे,त्यामुळे लवकरात लवकर या साठवण तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे,पाणी सोडण्याची मागणी युवा सहकारी परमेश्वर गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य संभाजी खैरे ,प्रल्हाद गायकवाड, सुखदेव गायकवाड , किसनराव काळे, चंद्रकांत जगताप,रघुनाथ वाघमोरे ,उपसरपंच शीतल त्रिंबक भोसले वासुदेव गायकवाड, बापूराव भोसले,राजेंद्र बरडे व ग्रामस्थांनी निवेदन सादर करून केली.

Previous articleवृत्तपत्रांची थकीत जाहिरातींची बिले त्वरित चुकती करण्याची एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleटेमघर येथील गरजू कुटुंबांना संसारोपयोगी जीवनावश्यक साहित्याचे वाटप