वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार व्हावा याकरिता हवेली तालुक्यात सामाजिक संस्थेची स्थापना-ह.भ.प आनंद महाराज तांबे

अमोल भोसले,उरुळी कांचन

समाजाला भक्ती मार्गाची आस लागावी तसेच वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार व्हावा यांसारख्या अनेक उद्दिष्टाने हवेली तालुक्यात सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती हभप आनंद महाराज तांबे यांनी दिली. ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्था या नावाने ही संस्था स्थापन केली असुन याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आव्हाळवाडी (ता.हवेली) येथे संपन्न झाला.

सध्याच्या काळात भक्ती मार्गापासून भरकटलेल्या व्यक्तीला, समाजाला भक्ती मार्गाची आस लागणे व संताचे थोर विचार पोहचवणे आवश्यक आहे. यासाठी हवेली तालुक्याच्या दहा गावतील वारकरी, दिंडी प्रमुख, प्रवचनकार व कीर्तनकार यांनी एकत्र येऊन ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्था स्थापना केली आहे. यावेळी उद्घाटन आव्हाळवाडी (ता.हवेली) येथील निळकंठेश्वर मंदिरात संस्थेचे अध्यक्ष शहाजी आव्हाळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना आव्हाळे सांगितले की समाजातील रंजल्या गांजल्यांना मदत तसेच संस्थेची उद्दिष्ट तळागाळात पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष मल्हारी गावडे (वाडेबोल्हाई), सचिव आनंद महाराज तांबे (थेऊर), सहखजिनदार विलास दादा उंद्रे (कोलवडी), खजिनदार बाळासाहेब बापूसाहेब सातव (वाघोली), हनुमंत महाराज शिवले (वढू), ज्ञानोबा दगडू काकडे (वडगाव शिंदे), निवृत्ती महाराज गलांडे (वडगाव शेरी), भाऊसाहेब आव्हाळे (आव्हाळवाडी), तात्याबा हरगुडे (केसनंद), सोमनाथ महाराज भालेराव (आळंदी देवाची) या कार्यक्रमसाठी ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक व वारकरी मंडळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना टोपी, उपरणे, संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ,तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप आनंद महाराज तांबे तर सुत्रसंचालन प्रकाश दादा आव्हाळे यांनी केले.

Previous articleहवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य सचिन सुंबे अभिमान पुरस्काराने सन्मानित
Next articleपिकअपचा पाठलाग करून नऊ लाखांचा गुटखा केला जप्त, शिरूर पोलीसांची कारवाई