व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवण्यासाठी राष्ट्रवादी युवकांच्या पोस्ट आँफिसच्या बाहेर रांगा

अमोल भोसले,उरुळी कांचन—प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठविण्यात येणार्‍या पत्रासाठी राष्ट्रवादीच्या युवकांनी पोस्ट अॉफिसच्या बाहेर रांगा लावल्याचे चित्र राज्यात पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना जय भवानी… जय शिवाजी अशा आशयाचे शब्द पत्रात लिहून २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय जाहीर केला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून ठिकठिकाणी युवक पदाधिकारी पोस्ट ॲाफिसच्या बाहेर उभे राहुन पत्र पाठवण्यासाठी रांगा लावून आहेत.

Previous articleकृषीविभागामार्फत कुरवंडी येथे महिलांना पिकविमा या विषयावर मार्गदर्शन
Next articleविद्युत तारा,मैलापाणी गटारी सुरक्षित ठिकाणी हलवूनच रस्त्याचे काम करा