मुळशी तालुक्यात रासायनिक कंपनीला आग, १५ महिलांचा मृत्यू

अतुल पवळे ,पुणे

पुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

दुपारी दोनच्या दरम्यान आग लागल्याची माहिती मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली.या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.

या केमिकल कंपनीत सकाळी ४१ कर्मचारी कामासाठी आले होते. या ४१ पैकी १७ लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी १५ महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाली, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

कंपनीमध्ये सॅनिटायझर निर्मिती

ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी ४१ कामगार कामावर आले होते. आगीनंतर १७ जण बेपत्ता आहेत. यात १५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश असून ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.

अग्निशामन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल

पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली असून कुलिंग काम सुरु असल्याची माहिती आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते.

मृतांमध्ये सर्व महिला
पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्व महिला कर्मचारी आहेत. आमदार संग्राम थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ कर्मचारी आग लागली त्यावेळी अडकले होते. त्यामध्ये १५ महिला कर्मचारी आणि २ पुरुष कर्मचारी यांचा समावेश होता.

Previous articleकचरा समस्येवर तोडगा न निघाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा
Next articleपिरंगुट येथील एमआयडीसी एस व्ही एस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीत भीषण आग